HW News Marathi
मुंबई

पायलटच्या सतर्कतेला सलाम, घाटकोपरकरांचे वाचवले प्राण

मुंबई | घाटकोपरमध्ये क्रॅश झालेले चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत महिला पायलट मरिया कुबेर यांच्या प्रसंगावधानाने घाटकोपरकरांचे प्राण वाचले. परंतु या दुर्घटनेत पायलट मरिया यांना जीव गमवावा लागला. चार्टर्ड विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समजल्यानंतर गर्दीच्या ठिकाणावरून विमान बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये लँडिंग केले.

पायलट यांना प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते. या ट्रेनिंगमुळे मोठी दुर्घटने टळली. परंतु दुदैवाने पायलटसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मरिया यांच्या प्रसंगावधानामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु, हे कौतुक ऐकण्यासाठी मरिया कुबेर मात्र आपल्यात नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पश्चिम रेल्वेच्या महिलाडब्यांचे आकर्षक रुप पाहिले का…

News Desk

पेंग्विनमुळे राणीच्या बागेत पर्यटक वाढले

News Desk

ऊसतोडणी माथाडी बोर्डाची अंमलबजावणी चालू हंगामापासून करा. – सिटू व शेतमजूर युनियनची मागणी

News Desk
मुंबई

घाटकोपरमध्ये क्रॅश झालेले चार्टर्ड विमान कुणाचे ?

News Desk

मुंबई | मुंबईच्या घाटकोपरमध्ये क्रॅश झालेले चार्टर्ड विमान उत्तर प्रदेश सरकारचे नाही. राज्य सरकारने ते मुंबईच्या यूवाय एविएशनला विकले होते. अलाहाबादमध्ये विमानात अपघात झाल्यानंतर हा करार करण्यात आला होता. असा खुलासा उत्तप्रदेशचे प्रमुख माहिती सचिव अवनीष अवस्थी यांनी एएनआयशी बोलताना केला आहे.

गुरुवारी मुंबईच्या घाटकोपर येथे जीवदया लेन परिसरात कोसळलेले चार्टर्ड विमान नक्की कुणाचे हा प्रश्न सद्या उपस्थित केला जात आहे. प्राथमिक माहितीत उत्तप्रदेश सरकारचे हे विमान असल्याचे बोलले जात होते. परंतु राज्य सरकारने हे विमान विकल्याचा खुलासा प्रमुख माहिती सचिवांनी केलेला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडे हे विमान असतानाही त्याचा अपघात झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

तसेच या अपघातात एका पादचा-याचा मृत्यू झाला असून दोन वैमानिक दोन विमानाचे देखभाल व्यवस्थापक असा एकूण पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

Related posts

मुंबईत अनेक ठिकाणी ‘नो गो झोन’

swarit

भाजपने ,रिपाइंसाठी सोडल्या १२ जागा 

News Desk

सरकारला धनगर समाजाला आरक्षण दयायचंच नाही !

News Desk