HW News Marathi
मुंबई

चौथा चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी

मुंबई | रांचीच्या न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना चौथा चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवली आहे. या चारा घोटाळ्यात ३१ आरोपी आहेत. यादव यांच्यावर वेगवेगळे असे ६ खटले सध्या सुरु असून हे त्यापैकी चार आरोपात कोर्टाने त्यांना दोषी ठरवले आहे. तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह १२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.

१९९६मध्ये जवळपास ९५० कोटी रुपयांचा चारा घोटाळा समोर आला होता. १९९०च्या दशकात चारा पुरवठ्याच्या नावाखाली सरकारी ट्रेझरीमधून अशा कंपन्यांना पैसे देण्यात आले होते. पण, या कंपनींना अस्तित्वात नव्हत्या. चारा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावेळी बिहार आणि झारखंड वेगळे झाले होते. तेव्हा लालू प्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१३ वर्षांची मुलगी गरोदर; दिला बाळाला जन्म

News Desk

भारतात मांसाहार बंदी केल्यास भूकबळी – जितेंद्र आव्हाड

News Desk

गुढीपाडव्याच्या आधी राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk
महाराष्ट्र

राज ठाकरे यांच्या भाषणात शरद पवारांचा प्रभाव | आशिष शेलार

News Desk

मुंबई | पूर्वी राज ठाकरे यांच्या भाषणात बाळासाहेबांचा प्रभाव दिसत होता. पण, आता त्यांच्या भाषणात शरद पवारांचा प्रभाव दिसत असल्याचे भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्याच्या एक दिवस आधी शरद पवारांच्या मुंबई येथील निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीत नेमके काय झाले, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर ही सदिच्छा भेट असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

तसेच विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, उरलेसुरलेले नगरसेवक पळून गेले असे प्रत्युत्तर भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले. मनसेच्या गुडीपाडवा मेळाव्यात ठाकरे यांनी‘मोदीमुक्त’ भारत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन ठाकरे यांनी केले होते.

“भारताला १९४७मध्ये पहिले स्वातंत्र्य मिळाले, १९७७ साली आणीबाणीतून दुसऱ्यांदा स्वायंत्र्य मिळाले, तर २०१९मध्ये भारताला मोदी मुक्त करा” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत म्हटले आहे. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

तसेच राम मंदिराची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. येत्या २०१९च्या निवडणुकासमोर ठेवूनच यांची सुनावणी पुढे ढकली जात आहे. निवडणुकीच्या काळात राम मंदिरावर निकाल आला की, त्याच महिन्यातच धार्मिक दंगली घडतील असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

Related posts

साताऱ्यात ऐतिहासिक भवानी तलवारीची मिरवणूक

News Desk

#SushantSinghRajput : सीबीआय टीम मुंबईत दाखल झाल्या झाल्या अँक्शन मोडमध्ये

News Desk

#COVID19 : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८६८वर, आज दिवसभरात १२० रुग्णांची नोंद

News Desk