HW News Marathi
मुंबई

माहुल प्रकल्पग्रस्तांचे ‘जीवन बचाव आंदोलन’

मुंबई | ‘माहुल प्रकल्पग्रस्तांना पुनर्वासित करण्यासाठी घरे आणि पैसा नाही’, असे प्रतिज्ञापत्र सरकारने न्यायालयात दाखल केले आहे. मुंबईत प्रकल्पग्रस्तांसाठी ७०,००० घरे रिकामी असून सुद्धा सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप करीत माहुल येथील प्रकल्पग्रस्तांनी विद्याविहार पाईपलाईन येथे ‘जीवन बचाव आंदोलन’ केले होते.

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये माहुल व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली तब्बल ७०,००० घरे रिकामी आहेत. त्याचप्रमाणे माहुलमधील प्रकल्पग्रस्तांना इतरत्र सुरक्षित ठिकाणी पुनर्वासित करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. तरीही सरकारकडून माहुल प्रकल्पग्रस्तांना पुनर्वासित करण्यासाठी घरे आणि पैसा नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवाद, आय. आय. टी.मुंबई आणि केईएम रुग्णालयाच्या अहवालानुसार माहुलगाव मानवी वस्तीसाठी अत्यंत हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.

गेल्या दीड वर्षांत माहुल येथील १०० पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर कित्येक जण वायू आणि जलप्रदूषणाने ग्रस्त आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील याचा विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. तरीही सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे माहुल प्रकल्पग्रस्तांकडून ‘जीवन बचाव आंदोलन’ करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आमदारांनाच गुंडाकडून धमकी – सुनिल प्रभू

swarit

पडसलगीकरांना पुन्हा मुदतवाढ नाही, मुंबईच्या नवीन सीपी पदी परमबीर की बर्वे ?

News Desk

राज्य शासनाच्या बारा अधिकाऱ्यांना ‘आयएएस’पदी पदोन्नती

News Desk
राजकारण

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कामाला लागा !

swarit

मुंबई | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. त्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची अधिकृत घोषणा केली आहे. भाजप शिवसेना यांची युती होवो अथवा न होवो मात्र आपल्या बळावर भाजपच्या साथीने दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी प्रचार कामाला लागावे, असे आठवले यांनी म्ह्टले आहे.

चेंबूर मैत्रीपार्क येथे रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले आहे. राज्यसभेत जीव रमत नाही नसल्याने लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेत असल्याचे रामदास आठवले म्हणाले आहेत. ‘शिवसेना-भाजप युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकसभा निवडणुकीत त्यांची निश्चित युती होईल असा मला विश्वास आहे’, असेही ते यावेळी म्हणाले.

‘माझ्या रिपब्लिकन पक्षाने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवशक्ती-भीमशक्ती युतीचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यामुळे शिवसेना माझ्यासाठी जरूर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडेल,’ असा विश्वास असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. रिपाइं कार्यालयाच्या उदघाटनावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात लावलेल्या हजेरीमुळे या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षातर्फे दलित-मुस्लिम एकजुटीचे सूत्र राबविण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.

Related posts

गडकिल्ले देण्याऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या !

News Desk

EXIT POLL : मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये कडवी टक्कर

News Desk

शिवसेनेच्या गटप्रमुख मेळाव्याच्या स्टेजवर संजय राऊतांसाठी खुर्ची आरक्षित

Aprna