HW News Marathi
मुंबई

मालाडमध्ये भीषण आग

मुंबई | मालाड येथील मालवणीमध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, ही आग लागण्याची कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जनतेशी संवादच न राहिल्यानं सरकारवर संवादयात्रेची वेळ – खा. अशोक चव्हाण

News Desk

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटुंचे हाल-बेहाल

swarit

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

Gauri Tilekar
महाराष्ट्र

वक्फ मालमत्तेची माहिती द्या – प्रधान सचिव श्याम तागडे

News Desk

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई. वक्फ मालमत्तेचे दुसरे सर्वेक्षण सुरू झाले असून या सर्वेक्षण ला मुसलमान बांधवांनी सहकार्य करावे असे आव्हान अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केले आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या शिष्ठमंडळाशी बोलताना त्यांनी सांगितले.

समाजाला समजून समाजाच्या समस्या, मूळ प्रश्नाला समजून आपण काम करत आहात त्याबद्दल मुसलमान समाजाच्या वतीने अन्सारी यांनी तागडे यांचे धन्यवाद दिले. ‘तहरी के औकाफ’ आज संपूर्ण महाराष्ट्रात कशा पद्धतीने कार्यरत आहे याची माहिती दिली. तसेच ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ९२ हजार एकर जमीन असून १ लाख मालमत्ता हि वक्फ बोर्डाची असून त्यासाठी ४३ कर्मचारी त्यात ९ शिपाई, १ वाहन चालक आहे. तर एवढ्या मोठ्या कारभाराला हे कर्मचारी सांभाळू शकतात का असा प्रश्न उपस्थित केला होता. गोंदिया जिल्ह्यातून लोकं येतात नोंदणी चे २५०० प्रकरणे प्रलंबित आहेत. ते आजपर्यंत मार्गी लागत नाही. हेरिंग साठी कोण भेटत नाही, लोकं थकून गेली, हैराण झालेत, परेशान झालीत. यांची कैफियत मांडली होती. कर्मचाऱ्यांच्या अभाव असल्याने त्यासाठी ग्रँड दिली गेली पाहिजे, किमान ६ कार्यालय झाली पाहिजेत, तर मुख्यमंत्र्यांनी मुंबई, नागपूर, औरंगाबाद असे ३ कार्यालय देतो, तसेच ७७० कर्मचारी देखील देण्याचे कबुली दिली होती. तर १०० कोटींची ग्रँड मागणी केली असता २०० कोटी देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते यावर लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा तागडे यांच्या कडे अन्सारी यांनी केली. वक्फ बोर्डात जर पहिल्या पासून चांगले काम झाले असते तर आज आम्ही खूप चांगले काम केले असते असे तागडे यांनी सांगितले. वक्फ बोर्ड हे वेल्टीलेटर आहे त्यात नक्कीच सुधार होईल असे आश्वासन अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी दिले. मालमत्तेचे जे दुसरे सर्वेक्षण सुरु आहे. त्याबद्दल तागडे यांनी आव्हान केले आहे की, समाजाच्या विविध संघटनांनी जिल्ह्यातील तालुका स्थरावर गावे-गावे फिरून लोकांशी चर्चा करून वक्फ मालमत्तेची माहिती घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी पर्यंत ती पोहचावा जेणे करून परिपूर्ण सर्वेक्षण होण्यास मदत होईल तसेच त्यासंदर्भात मी स्वतः दौरा करणार असल्याचे तागडे यांनी सांगितले. त्यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आमच्या कडून वक्फ संदर्भात जनजागृती मोहीम केली जात असल्याची माहिती दिली. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सोलापूर चे अध्यक्ष इसाक खडके, मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी, सइद खान, पुणे सदस्य सिराज शेख, सयेद शकील, परभणी चे अध्यक्ष सयेद फारूक, मिर्झाअब्दुल कय्युमनदवी आदी उपस्थित होते.

Related posts

अखेर गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk

रामदास आठवलेंची भूमिका मराठी भाषेविरूद्ध?

News Desk

होळी घराच्या दारात पेटवायची नाही, मग काय घरात पेटवायची? भाजपचा सरकारला सवाल

News Desk