HW News Marathi
मुंबई

मरोळ नाका परिसरातील इमारतील आग, दोन बालकांसह चार ठार

मरोळ नाका परिसरातील एका इमारतीला आग लागून दोन बालकांसह चार जण ठार झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. मध्यरात्री दीडच्या सुमारास मामून इमारतीला आग लागली.

त्यानंतर अडीचच्या सुमारास अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आगीत अडकलेल्या नागिरकांनी बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. तिसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याने नागिरकांनी वाचवताना दोन बालकांसह चौघांचा बळी गेला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईकरांची तारांबळ करून, भाजपचे जोरदार प्रदर्शन

News Desk

ST Strike: वकील गुणरत्न सदावर्ते किला कोर्टात दाखल

Manasi Devkar

ओशिवरा बांधकाम व्यवसायीकाच्या घरात घुसून हत्या पत्नीवर हल्ला

News Desk
राजकारण

‘लोकसंघर्ष मोर्चा’ आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk

मुंबई | वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढण्यात आला आहे.शेतकरी आणि आदिवासींचा ‘लोकसंघर्ष मोर्चा’ सोमय्या मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे.

शेतकरी सरकार विरोधात घोषणा देत पायी चालत आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. शेतकऱ्यांनी बुधवारी(२१ नोव्हेंबर)ला सोमय्या मैदानात मुक्काम केला. त्यानंतर आज(२२ नोव्हेंबर)ला पहाटे साडेचारच्या सुमारास शेतकरी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. या विराट मोर्चात महिला, पुरुषांसह वृद्ध आणि लहान मुलंही सहभागी झाले आहेत.

लोकसंघर्ष मोर्चा सध्या लालबागमध्ये पोहचला आहे. काही वेळातच हा मोर्चा आझाद मैदानात दाखल होईल. या शेतकऱ्यांची चौकशी करून परिस्थितीचा जाणून घेण्यासाठी कल (२१नोव्हेंबर)च्या रात्री उशिरा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला आहे. प्रतिभा शिंदे काही सहकाऱ्यांसह दुपारी साडेबारा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडतील.

या शेतकरी मोर्चा मंगळवारी (२०नोव्हेंबर)ला मुंबईत दाखल झाला आहे. हा मोर्चा लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे.या मोर्चात संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली, साताऱ्यासह ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले आहेत. ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्यातील आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत.

ज्येष्ठ न्यायाधीश बी. जे. कोळसे-पाटील अध्यक्ष असून जलपुरुष राजेंद्र सिंग, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, काळू राम काका दोधडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यात राष्ट्र सेवादला, भारत बचाव आंदोलन, विद्यार्थी भारती संघटना यांचे कार्यकर्ते मोर्चा सहभागी होणार आहेत.

 

Related posts

देशभरात १३ राज्यांत ९७ जागांसाठी आज होणार मतदान

News Desk

आम्ही युतीकडे १० जागांची मागणी केली आहे !

News Desk

…म्हणून सुनावणी संपताच साध्वी प्रज्ञा यांनी भर न्यायालयात केला थयथयाट

News Desk