HW News Marathi
मुंबई

विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे मोबाईल लंपास

मुंबई | गणपती विसर्जनासाठी काल (२३ सप्टेंबर) मुंबईतील लालबाग-परळमध्ये लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांवर चोरट्यांनी हात साफ केला. या भक्तांचे मोबाईल, पाकिटे, आणि दागिने लपास झाल्याच्या अनेक तक्रारी आज (२४ सप्टेंबर) काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत.

विसर्जन मिरवणुकीत सुमारे ३०० ते ४०० अशा चोरी झाल्याच्या तक्रारी एकट्या लालबाग परिसरातील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केला आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जेवढ्या चोऱ्या झाल्या नाहीत, तेवढ्या चोऱ्या विसर्जन मिरवणुकीत झाल्याचे देखील म्हटले जात आहे.

तसेच गणेशोत्सवाच्या काळात लालबागचा राजा मंडपातून जवळपास १३५ मोबाईल चोरीच्या तक्रारीची नोंद करण्यात आली. मोबाईलच्या तक्रारी नोंदवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. मोबाईल चोरीच्या सर्वात जास्त तक्रारी या लालबागचा राजा परिसरात घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केडीएमसीने रस्त्यावर खड्डे पडण्याचे खापर पावसावर फोडले

News Desk

नीट परीक्षेसाठी लढा देणाऱ्या तरूणची आत्महत्या

News Desk

शिवाजी पार्कच्या गणपतीला हापूस आंब्यांची आरास

News Desk