HW News Marathi
मुंबई

मुलुंड डंपिंग ग्राऊंड १ ऑक्टोबरपासून बंद

मुंबई | मुंबईतील वाढता कचरा कुठे टाकायचा हा प्रश्नचं आहे. कारण आता मुंबईतील सर्वाधिक कचरा टाकण्यात येणाऱ्या मुलुंड मधील डंपिंग ग्राऊंड १ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. तर, कांजूर आणि देवनार या डंपिंगची क्षमता संपत आल्यामुळे येणाऱ्या काळात कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न पालिके समोर उभा राहणार आहे.

सध्या मुंबईत दिवसाला ७,२०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणारा कचरा मुलुंड, कांजूर व देवनार डंपिंग ग्राऊंडवर विस्तारित करण्यात येतो. मात्र सद्यस्थितीत मुलुंड डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपत आली आहे. त्यातच पुढील सहा वर्षांकरिता पालिकेने सुमारे ७३१ कोटी रुपये खर्च करत मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्याचे कंत्राट फेब्रुवारी २०१८ मध्ये दिले आहे.

स्थायी समितीनेही ७३१ कोटी रुपयांच्या कंत्राटाला मंजुरी दिली आहे. परंतु प्रशासनाने आता १ ऑक्टोबरपासून मुलुंड डंपिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ७३१ कोटी रुपयांच्या कंत्राटाचे काय करणार, असा प्रश्न निर्माण होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईतील पादचारी पूल हे ‘मृत्यूचे पूल’ राहू नयेत !

News Desk

मुकेश अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या टेरेसवर आग

News Desk

भारतीय लष्करावर पादचारी पुल बांधण्याची वेळ !

News Desk
मुंबई

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणातील तपासावर हायकोर्ट नाराज

swarit

मुंबई | मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासात होत असलेला निष्काळजीपणावरून खडे बोल सुनावले आहे. शिवाय दाभोलकर-पानसरे हत्याकांडाबाबत तपासाचा प्रगती अहवाल स्वीकारण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. दाभोलकर-पानसरे ह्त्या प्रकरणात होत असलेल्या विलंबावरून मुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासातून काही तरी शिका, असे म्हणाले.

तपास अहवालात वारंवार त्याच गोष्टी हायकोर्टापुढे मांडल्या जात आहेत. तपास आधिकारी बदलले जातात. या घटनांचा समाजावर होणारा परिणाम फार गंभीर स्वरुपाचा असतो. त्याची आम्हाला जास्त काळजी वाटत असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.दाभोलकर-पानसरे हत्याकांडाच्या तपासाचा सीलबंद अहवाल सीबीआय आणि एसआयटीने मुंबई हायकोर्टात नेहण्यात आला होता. परंतु हायकोर्टाने या दोघांच्या हत्याकांडाच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत हा सीलबंद अहवाल न वाचता परत केला. या हत्याकांडात सतत होत असलेली दिरंगाई आणि निष्काळजीपणा यामुळे हायकोर्टाने तपासावर नाराजी व्यक्त केली आहे.

हायकोर्टात दाभोलकर-पानसरे हत्याकांडाच्या सुनावणी दरम्यान सीबीआयचे सहसंचालक, गृहसचिव आणि एसआयटीचे प्रमुख यांनी देखील आज हजेरी लावली होती. यांच्यासमोर हायकोर्टाने तपासावर नाराजी व्यक्त केली. तपास यंत्रणा अजून दोन महिन्याचा अवधी मागत आहे. त्यानंतर सणासुदीचे दिवस असल्याने हा कालावधी हवा आहे का? सर्व यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त असेल, अशा शब्दात हायकोर्टाने तपास यंत्रणेचे कान टोचले.

Related posts

गिरीश बापट यांच्या शासकीय बंगल्याला भीषण आग

News Desk

फक्त तेराशे रुपयेसाठी मित्राने केला मित्राचा खून

News Desk

मुले विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,

News Desk