HW News Marathi
मुंबई

मुंबई हळूहळू येतेय पूर्वपदावर!

मुंबई : काल दिवसभर अक्षरश: झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर रात्रीपासून काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी तुंबलेले पाणी ओसरत असून मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवाही हळूहळू सुरू झाली आहे. त्यामुळे काल दिवसभराच्या पावसाने विस्कटलेली मुंबईची घडी पुन्हा बसत आहे. मुंबईचे जनजीवन पूर्व पदावर येत आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाऊ शकते.

सीएसटीहून कल्याणला जाणारी पहिली लोकलआज सकाळी ७.३० च्या दरम्यान रवाना झाली. त्यामुळेरात्रभर अडकलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला, तर हर्बर मार्गावरील वाहतूक ९ वाजून ३ मिनिटांनी सुरू झाल्याने चाकरमान्यांचा जीव भांड्यात पडला. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यानची लोकलची वाहतूक पाण्यामुळे संथ गतीने सुरू आहे. ठाणे-वाशी ही ट्रान्स हार्बरची वाहतूक मात्र सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणी ओसरू लागल्यानं पूर्व आणि पश्चिम महामार्ग मोकळे झाले आहेत. पूर्व महामार्गावर सध्या कुठेही ट्रॅफिक जाम नाही. दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक रात्री १० वाजताच सुरू करण्यात आली होती. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरू झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले, दोन जणांचा मृत्यू

swarit

नीट परीक्षेसाठी लढा देणाऱ्या तरूणची आत्महत्या

News Desk

आगामी निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार

News Desk
मुंबई

निकाल लागला पण विद्यार्थ्यांनी नाही पाहिला

News Desk

मुंबई : धडपडत, चाचपडत रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने एकदाचा टीवाय बीकॉमचा निकाल जाहीरकेला खरा, पण अद्यापही तो विद्यार्थ्यांना काही पाहाता आलेला नाही. संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचे कारण यासाठी देण्यात येत असले, तरीही त्याने त्रस्त विद्यार्थ्यांचे काही समाधान झालेले नाही. त्यामुळे सोमवारी अनेकविद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली होती. मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिलदरम्यान, पदवी अभ्यासक्रमाच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन सुरू आहे. ऑगस्ट महिना उजाडूनही ४० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेलेनाहीत. काही निकाल तांत्रिक अडचणींमुळे राखीव ठेवले आहेत. मात्र येत्या १० दिवसांत विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.

Related posts

संतप्त मुंबईकरांनी भाजप मेळाव्याला जाणा-या बस रोखल्या

News Desk

गांधीजींचे छायाचित्र हटवून सरकारने केला राष्ट्रपित्याचा अवमान

News Desk

शाळा आणि महाविद्यालयांसाठी तंबाखूमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम | गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

News Desk