HW News Marathi
मुंबई

Parel Fire | चिमुरडीने वाचवले कुटुंबियांचे प्राण

मुंबई | परेलमधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. आगीच्या धुराने लिफ्टमध्ये गुदमरून दोन जणांना तर आगीत होरपळून दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून अनेकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले असून काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत प्रसंगावधान बाळगत एका १० वर्षाच्या चिमुरडीने(झेन) आपल्या कुटुंबियांना सुरक्षितपणे आगीबाहेर पडण्याचे तंत्र दाखवत त्यांचे प्राण वाचवले.

‘झेनने घाबरून न जाता हाताला लागतील ते सर्व कपडे आई-बाबांना पाण्यात भिजवायला सांगितले. ते ओले कपडे कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना श्वासोच्छ्वावासासाठी नाकाजवळ धरण्यास सांगितले. या ओल्या कपड्यात कार्बन शोषला जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्यामुळे तो कपडा नाकाजवळ धरला कि आगीच्या धुरामुळे श्वसनासाठी होणार त्रास कमी होतो. या शाळेत शिकलेल्या गोष्टी झेनने खऱ्या आयुष्यात वापरत अनेकांचे प्राण वाचवले.

इमारतीला आग लागल्याचे कळताच संपूर्ण कुटुंब घाबरले असताना झेनने मात्र आगीतून बाहेर पडण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र वापरून कुटुंबासह इमारतीतील इतर रहिवाश्यांचे जीव वाचवले. या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

संबंधित बातम्या

परेल येथील क्रिस्टल टॉवरच्या आगीत चार जणांचा मृत्यू

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डहाणूत ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली

News Desk

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक होणार अंडरग्राऊड

News Desk

मुंबईच्या नेपीएन्सी रोडवरील इमारतीला लागली आग, कोणतीही जीवितहानी नाही

News Desk
क्रीडा

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ | भारताला आणखी एक सुवर्णभेट

News Desk

जकार्ता | महाराष्ट्राच्या राही सरनोबत हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णभेट दिली आहे. राहीने २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेले हे चौथे सुवर्णपदक आहे. तर राहीचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक असून तिने नवा इतिहास रचला आहे. पात्रता फेरीत फारशी उत्तम कामगिरी करता न आलेल्या राहीने अंतिम सामन्यात मात्र कोणतीही कसर सोडली नाही.

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात राहीला सुरुवातीपासूनच थायलंडच्या यांगपाबूनचे कडवे आव्हान होते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल याचा अंदाज लावणे कठीण झाले होते आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी राही सरनोबत ही पहिली भारतीय महिला शुटर ठरली आहे. परंतु भारताची स्टार नेमबाज मनू भाकर ही पदक पटकावण्यात अपयशी ठरली.

संबंधित बातम्या

आशियाई क्रीडा स्पर्धेचे आज शानदार उद्घाटन

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

Related posts

लंच आधी शतक करणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज

News Desk

विदर्भ संघाने दुसऱ्यांदा रणजी करंडकावर नाव कोरले

News Desk

सानिया मिर्झा-शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

swarit