HW News Marathi
मुंबई

महाराष्ट्रातील पेंशनरचे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन

मुंबई | इपीएस १९९५ पेंशनरांचा सरकार अंत पहात आहे काय ? असे वाटावे इतके या प्रश्नावर सरकारने दुर्लक्ष केले आहे. २ वर्षाचे वेटेज देण्याचा नियम असूनही पेंशन देत नाहीत. रिड्यूस पेंशनसाठी वार्षिक ३% दराने कपात होती, ती २००८ मध्ये ४% करायला सुरुवात केली. पेंशनपात्र वेतन कालावधी १२ महिन्याची सरासरी होती, ती २०१४ मध्ये ६० महिन्यावर नेली. म्हणजे वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या माणसाला केंद्र सरकारने काही वाढ द्यायला हवी. त्याऐवजी पेंशन कपातीची क्तृती वापरली. यासाठी आज २४ ऑक्टोंबर रोजी आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील पेंशनर धरणे आंदोलन केले.

या योजनेत मार्च २०१७ अखेर तीन लाख अठरा हजार कोटी रुपये जमा असून, त्यात दर महिन्याला ६२१ कोटींची भरच पडतेय, आणि तुटपुंज्या पेंशनमुळे मारणाऱ्या माणसांची संख्या पण वाढतेच आहे. कोशीयारी समीतीचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवणारे सरकार गेलेआम्ही आल्यावर ९० दिवसात कोशीयारी अहवाल अंमलात आणू. असे सांगणारे ९० दिवस राहिलेत तरी गप्प बसले आहेत. आमच्या मागण्या मान्य केल्या तर सरकारवर काहीही आर्थिक बोजा पडणार नाही, हे आम्ही जाणतो.

पण आम्हाला न्याय दिला तर पंचवार्षिक मनसबदारांच्या पेंशनचे काय? पेंशनरांचा हाच प्रश्न चव्हाटगावर आणण्यासाठी आज २४ ऑक्टोंबर रोजी आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील पेंशनर धरणे आंदोलन केले. यावेळी निवृत्त कर्मचारी १९९५ समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, महाराष्ट्र राज्य पेंशनर संघटना, इंडस्ट्रीयल पेंशनर्स असोसिएशन ठाणे, राज्य परिवहन निवृत्त संघटना, या सर्व संघटनांनी एकत्र येऊन उभारलेल्या महाराष्ट्र राज्य इपीएस१९९५ संयुक्त कृती समितीचे सर्व सभासद आंदोलनात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानावर दाखल होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारतमाता चित्रपटगृहासमोर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

swarit

लॉटरी व्यवसायिकांचा आंदोलनाचा इशारा

News Desk

पंतप्रधान मोदी यांचे मावळे म्हणून निवडणुकीला सामोरे जा

News Desk
मुंबई

शेतीसाठी माहिती तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते | व्यंकय्या नायडू

Gauri Tilekar

मुंबई | पवई येथील आयआयटी मुंबईच्या हरिक महोत्सवी वर्षानिमित्त परिषदेचे शुभारंभ करण्यात आले.त्या दरम्यान उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी भाषण केले.डिजिटल हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तसेच शास्वत शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा असे अहवान नायडू यांनी दिले. महाराष्ट्रचे राज्यपाल सी विध्यासागरराव, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे अशा मान्यवरानी उपस्थिती लावली होती.

व्यंकय्या नायडू यांनी नमस्कार करत भाषणाला सुरुवात केली मीही एका शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला शेतीचे बरचसे ज्ञान आहे . आपल्या मातृभाषेचा आदर करावा तसेच शेतीच्या समस्याकडे लक्ष द्यावे आणि त्यासाठी एएफआरआयटीए तसेच डब्लुसीसीए या दोन्ही आंतराष्ट्रीय संस्था एकत्र येऊन या आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले ही कौतुकाची गोष्ट आहे.

Related posts

कल्याण-मुरबाड मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील

News Desk

मुंबईतील गारवा होणार १५ दिवसांसाठी गायब 

News Desk

डॉक्टरावर कोयत्याने हल्ला

News Desk