HW News Marathi
मुंबई

आर. के. स्टुडिओच्या आगीची ही आहेत खरी कारणे

मुंबई- येथील ऐतिहासिक व सुप्रसिद्ध आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत स्टुडिओचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. दोन ते तीन तास आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न सुरू होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात होत्या. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. आगीमुळे संपूर्ण परिसरात उंचच उंच धुराचे लोट दिसत होते. घटनास्थळी जाणाºया मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. अखेर उशिरा आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले. आगीचे कारण अद्याप झालेले नाही. परंतु स्टुडिओमध्ये बहुतांश वस्तू लाकडाच्या होत्या. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. आगीत चित्रिकरणासाठी लागणारे साहित्य जळून खाक झाले आहे, त्याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात होती. या सर्व वस्तुंचा विमा काढलेला असणारच, त्यामुळे त्याची भरपाई मिळण्याची शक्यता आहे. दुसरे म्हणजे ही वास्तू अनेक कारणांसाठी ऐतिहासिक असली तरी सध्याच्या वातावरणात ती कालबाह्य वाटत होती. आगीत ही वास्तू उध्वस्त झालेलीच आहे, त्यामुळे या ठिकाणी पुन्हा स्टुडिओ उभारणीसाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे, त्या ऐवजी या जागेचा उंच इमारत उभारण्यासाठी भविष्यात वापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वसई फाटा येथे पुठ्ठ्यांच्या गोदामाला भीषण आग

Gauri Tilekar

शास्त्रज्ञ भास्कर दत्त यांचा बेपत्ता मुलगा नमनची नैराश्यामुळे आत्महत्या ?

Gauri Tilekar

निधी नको, सुरक्षित ठिकाणी घर द्या, माहुल प्रकल्पग्रस्तांची मागणी

News Desk
कृषी

आश्चर्य…शेळीने दिला आठ पायाच्या पिलाला जन्म

News Desk

छत्तीसगढ चार किंवा सहा पिल्लांना जन्म दिलेल्या बकऱ्या आपल्याकडे आहेत. परंतु एका शेळीने तब्बल आठ पाय असलेल्या पिल्लाला जन्म दिल्याचा आश्चर्यकारक प्रकार बलरामपूर येथे घडला आहे.

छत्तीसगढमधील बलरामपूरच्या कर्वशिला गावात हा प्रकार घडलेला असून लोकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. हे पिल्लु पाहण्यासाठी पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे गर्दी करीत आहेत. काही लोक याला निसर्गाचा चमत्कारही मानत आहेत. विशेष म्हणजे या करडाची प्रकृती चांगली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हा कुठलाही चमत्कार नसून प्राण्याची वाढ होत असताना दोष निर्माण झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे

Related posts

‘दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?’ – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

News Desk

‘कोकण कपिला’ नावाने होणार कोकणातील देशी गायींची नोंदणी

News Desk

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

Chetan Kirdat