HW News Marathi
मुंबई

रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी अंधारात

मुंबई | वरळीची माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी गेल्या महिनाभरापासून अंधारात आहे. या ठिकाणी विजेच्या दिव्यांची सोय नसल्यामुळे गेल्या महिनाभरापासून लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी पुरता प्रकाश मिळत नसल्यामुळे लोकांना मोबाईल टॉर्च च्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

या समस्येला त्रासलेले वरळीर सध्या स्मशानभूमीत वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करत आहेत. सध्या या स्मशानभूमीचा वापर वरळी कोळीवाडा ते प्रभादेवी, डिलाईल रोड ते दिपक टॉकीज परिसरात रहाणारे रहिवाशी करतात. या ठीकाणी असलेले तीनही लाईटचे पोल बंद आहेत काही तांत्रिक बिघाडामुळे गेल्या काही दिवसात हे विजेचा प्रवाह बंद असल्याचे पहायला मिळत आहे. या बाबत महापालिकेकडे तक्रार करुनही पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रात्रीच्या वेळी मोबाईल टॉर्च च्या उजेडात लोकांना अंत्यसंस्कार करावे लागतात ही बाब अत्यंत वाईट आहे.

विज नसल्याने स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वीद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्यात यावा. आठमहिन्यापूर्वी स्मशानभूमीत प्रकाश पडावा अशा लाईटची सोय स्मशानभूमीत करण्यात आली होती. प्रशांत सकपाळे तेव्हा जी साऊथ ला सहायक आयुक्त होते. सध्या विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे कारण या पोलला विद्युत पुरवठा करणारी केबल ब्रेक झाली आहे.

परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या समस्येला वरळीकरांना सामोरे जावे लागत आहे. येत्या २ दिवसात जर विजेचे दिवे सुरु झाले नाहीत आणि विद्युत पुरवठा सुरळीत सुरु झाला नाही तर शिवसेना आंदोलन करेल असा इशारा वरळी विधानसभेचे युवासेना उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटिल यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोचिंग क्लासच्या संचालकाने केला मुलावर अत्याचार

News Desk

मनसेच्या ६ नगरसेवकांची घरवापसी, शिवसेनेनं मनसेला पाडलं खिंडार

News Desk

लोअर परळचा पूल आजपासून बंद, चाकरमान्यांचे हाल

News Desk
मुंबई

लव्हगुरु सुमेध गायकवाड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

News Desk

मुंबई | जिथे लव्ह आला, तिथे लफडा झालाचं! असं आपला लव्हगुरु सुमेध गायकवाड तरुणाईला सांगतोय. सुमेध ‘लव्ह लफडे’ या चित्रपटाच्या निमित्ताने तरुणाईला प्रेमाचे धडे, लव्ह फंडे देताना दिसणार आहे. कॉलेजकट्टा, कॉलेजमधली मुलांची मैत्री, पहिलं प्रेम, नातेसंबंध, तरुणाईच्या मनातील घालमेल, खरं प्रेम म्हणजे नक्की काय? हळूवार प्रेमाची भाषा, त्या मागची भावना या सगळ्यांची धम्माल ‘लव्ह लफडे’ चित्रपटामध्ये सुमेध गायकवाड करणार आहेत.

अवधूत गुप्ते दिग्दर्शित झेंडा, मोरया या चित्रपटामधून सुमेध गायकवाडची अभिनय क्षेत्राची वाटचाल सुरु झाली. त्यानंतर संतोष माईनकर दिग्दर्शित ‘प्रेम ऍट फर्स्ट साईट’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत, प्रसाद आचरेकर दिग्दर्शित‘अकल्पित’ ह्या चित्रपटात सुमेध आपल्याला दिसला.हिंदीतील ‘गुमराह’ सारख्या मालिकेन मध्ये ही त्याने काम केलं आहे. स्वप्नांच्या वलयाचं सत्यात रूपांतर करणं प्रत्येकालाच जमेल असं नाही. पण ‘एक एक पाऊल पुढे टाकले की त्या स्वप्नांपर्यंतचं अंतर कमी होतं’ असं म्हणतात. हीच भावना उराशी बाळगून सुमेध गायकवाड ह्या तरुणाने फोटोग्राफर ते पब्लिसिटी डिझायनर ते प्रोड्युसर ते ऍक्टर हा प्रवास अनुभवला. फोटोग्राफी मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावूनही सुमेधने त्याचं ऍक्टिंगचं स्वप्नं सोडलं नाही, त्याने आपली वाटचाल त्या दिशेने सुरूच ठेवली. ‎

२०१५ मध्ये सॅक्रेड बुद्धा क्रीएशन प्रोडक्शन स्थापन केले आहे. ‎त्यातून ‘लव लफडे’ नावाचा पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे लेखन संजय मोरे यांनी तर दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केले आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे नवीन चेहरे तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत. लवकरच हा चित्रपट एचसीसी नेटवर्क ऍपद्वारे आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे. ऍपद्वारे प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे.

Related posts

नगरसेविका पत्नीच्या डोक्यात नारळ मारून प्रचाराला सुरूवात  

News Desk

वाशी जवळ उलटलेली क्रेन हटवण्याचेकाम अद्याप सुरुच

News Desk

गोखले पुलाचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

News Desk