HW News Marathi
मुंबई

चैत्यभूमी येथील भीम ज्योतीचे काम रिपब्लिकन सेनेने थांबविले

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी (६ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दादर चैत्यभूमी येथील भीम ज्योतीचे उदघाटन होणार होते. मात्र, या भीमज्योतीचे सुरु असणारे काम रिपब्लिकन सेनेने अडविले आहे. एमएमआरडीए कडून हे काम सुरु होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मनोहर भिडेला अटक करा अन्यथा २६ रोजी मुंबईत मोर्च

News Desk

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, अवधूत तटकरे शिवबंधनात

News Desk

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली, ४० ते ५० जण अडकल्याची भीती

News Desk
राजकारण

जाणून घ्या… काय आहे ऑगस्ता घोटाळा

News Desk

मुंबई | ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि ब्रिटीश नागरिक ख्रिस्तियन मिशेलला दुबईतून भारतात आणण्यात आले आहे. ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ व कंत्राटासाठी कंपनीकडून सुमारे २२५ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आरोप ख्रिस्तियनवर लावण्यात आला आहे.

नेमके काय आहे ऑगस्त घोटाळा

भारतीय हवाई दलाने २०१० मध्ये इटलीच्या ऑगस्ता या कंपनीकडून ३ हजार ६०० कोटी रुपयात १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचा करार केला होता. हा व्यवहार ज्यावेळी झाला होता, त्यावेळी केंद्रात यूपीए सरकार सत्तेत होते तर मनमोहन सिंह हे देशाचे पंतप्रधान होते. तर हवाई दलाचे प्रमुख एस.पी. त्यागी होते.

या व्यवहारासाठी कमीशनरुपी १० टक्के म्हणजे सुमारे ३५० कोटी रुपये लाच म्हणून देण्यात आली होती, असे सांगण्यात येते. या व्यवहारात लाचखोरी झाल्याचे २०१२ मध्येसमोर आले. घोटाळ्याच्या गदारोळानंतर २०१३ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचे कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. तोपर्यंत तीन हेलिकॉप्टर्स भारतात आले होते

इटलीच्या कोर्टाने या संपूर्ण व्यवहारात १२५ कोटी रुपयांची लाचखोरीचा प्रकार घडल्याचा ठपका ठेवला आहे. ऑगस्ता वेस्टलँड आणि ‘फिनमेक्कनिका’ या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या प्रमुखांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

टलीच्या न्यायालयाने याप्रकरणात ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या प्रमुखाला शिक्षा ठोठावल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेला आले आहे. या कंपनीच्या प्रमुखाने या व्यवहारासाठी भारतात लाच दिल्याचा आरोप आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतात कोणाला लाच दिली हे अद्याप समोर आले नसले तरी कोर्टाने चार वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले आहे.

 

Related posts

देशाची अर्थव्यवस्था संकटात, नव्या अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा !

News Desk

बंडखोरी केल्याने तृप्ती सावंत यांची शिवसेनेकडून हकालपट्टी

News Desk

“राजकाणात जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे”, अमित शहांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Aprna