HW News Marathi
मुंबई

एसएनडीटी लैंगिक अत्याचार प्रकरणी वॉर्डन निलंबित

मुंबई | लैंगिक अत्याचाराची तक्रार आणि त्यानंतर विद्यार्थिनींच्या आंदोलनामुळे एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आज हॉस्टेलच्या वॉर्डनला निलंबित करण्यात आले आहे. एसएनडीटी वसतिगृहातील विद्यार्थिनी गेले दोन दिवस वॉर्डनने एका विद्यार्थिनीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या व गैरवर्तणुकी विरोधात आंदोलन करत होत्या.

अभाविपच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या आंदोलनात सर्व विद्यार्थिनी वसतिगृह वार्डनच्या निलंबनाची मागणी करत होत्या. अभाविप कार्यकर्त्यांनी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी ह्यांना वसतिगृहात घडलेल्या गैरप्रकाराची माहिती दिली आहे. कुलगुरू डॉ. वंजारी ह्यांनी वसतिगृह अधिक्षिकेचे निलंबन पत्र जारी केले होते व आंदोलनकर्त्या विद्यार्थिनी आणि अभाविप कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे की ह्या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी एक चौकशी समिती तयार केली जाईल.

अभाविप महिला कार्यकर्ता आणि एसएनडीटी विद्यापीठाची विद्यार्थिनी मानसी मालवणकर हिने कुलगुरू डॉ. वंजारी ह्यांच्या चौकशी समिति गठित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. “महिलांना शिक्षण देणाऱ्या नामवंत शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थिनीशी अशी वागणूक होत असेल तर ते लज्जास्पद आहे. विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करणा-या वॉर्डनला कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे मत तिने व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रस्त्यात खड्डे खड्ड्यात ‘पेव्हर ब्लॉक’

News Desk

मुंबईतलं जिना हाऊस तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा – आ. लोढा

News Desk

मुंबई भाजपाची निवडणुक समिती जाहीर

News Desk
मुंबई

माहुलवासीयांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

News Desk

मुंबई | देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रदूषणाचे वारे आहेत. या प्रदूषणामुळे गेल्या अनेक वर्षापासून श्‍वास कोंडलेल्या चेंबूर येथील माहुलवासीयांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकार आणि पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात चिड निर्माण झाली आहे. येथील रहिवाशांचे लवकरात लवकर पूनर्वसन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या नगरीत मोठ्या प्रमाणात पालिका प्रशासन विकास कामे करत आहे. हा विकास करताना बरेच लोक प्रकल्पबाधित होत आहेत. या प्रकल्पबाधिताना पालिका माहूल येथे पूनर्वसन करते लोक येथे जायला तयार नसताना सुद्धा या लोकांना पालिका तेथे ढकलत आहे. माहूल समस्यांचे मोठ्या प्रमाणात आगर झाल्यामुळे येथील रहिवाशांचे स्थलांतर दुसर्‍या ठिकाणी करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. माहूलवासीयांच्या समस्येवर लोकप्रतिनिधीसाठी बोलावलेल्या आश्‍वासन सभेत पाटकर यांनी येथील समस्या प्रभावीपणे मांडली आहे. या सभेत स्थानिक आमदार उपस्थित होते.

माहुलमध्ये पाच हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत. कॅगने आपल्या अहवालात माहुलमध्ये विकासकाला फायदा करून देण्यासाठी जास्त एफएसआय दिल्याचा ठपका ठेवला आहे. पाणी आणि वायू प्रदूषणाचा कायदा धाब्यावर बसवत विकासकाला कोट्यवधी रुपयांचा फायदा करून देणे हे निषेधार्थ असल्याचे पाटकर यावेळी म्हणाल्या आहेत. न्यायालयाने या ठिकाणी कुणाचेही पुनर्वसन करू नये असे म्हटले आहे. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

माहुलवासियांचे पुनर्वसन मंत्री प्रकाश मेहता यांचा विभाग करेल अशी अपेक्षा होती. आता पयार्वरण मंत्री रामदास कदम यांनी माहुलमध्ये प्रदूषण असल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्यामुळे माहुलवाशांच्या पाठीशी असणाऱ्या शिवसेनेने याबाबत पाठपुरावा करून रहिवाशांचे पुनर्वसन करायला हवे असेही पाटकर यांनी सांगितले तसेच न्यायालयाचे आदेश किंवा लोकप्रतिनिधींची भाषा प्रशासनाला कळत नाही. प्रशासन नीट नसल्याने माहुलवासियांना आंदोलन उभारावे लागले. आज (मंगळवार) या आंदोलनाची दखल सर्वानाच घ्यावी लागली आहे. अधिवेशन काळात सर्व आमदारांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. पालिकेने सर्व विभागात पीएपीची घरे बांधल्यास पुनर्वसन करणे सोपे होईल, असे आमदार रमेश लटके यांनी सांगितले.

मुंबईमधील सर्व प्रकारच्या प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये आणून टाकले जाते. या प्रकल्पग्रस्तांना जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार कोणीही हिरावू शकत नसल्याने त्यांचे सरकारने दुसरीकडे पुनर्वसन करावे. अन्यथा माहुलवासियांना ते आधी ज्या ठिकाणी राहत होते. त्याच ठिकाणी पुन्हा घरे बांधावी लागतील. माहुलवासियांच्या पुनर्वसनाच्या हक्कासाठी शिवसेना त्यांच्या सोबत राहिल, असे आश्‍वासन आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिले आहे.

Related posts

पालिका नव्हे यंदा गणेश मंडळेच बुजविणार खड्डे

News Desk

पालघर प्रकरणाची बाजू मांडणाऱ्या वकीलाचा अपघाती मृत्यू, भाजपची चौकशीची मागणी

News Desk

वांद्रे गरीबनगरमध्ये 4 सिलेंडरचा स्फोट, भीषन आग, 22 गाडया घटनास्थळी, video

News Desk