HW News Marathi
मुंबई

मुंबईतील चौपाट्या आता लवकरच होणार चकाचक

मुंबई | पावसाळ्यात मुंबईकरांची पावले आपोआपच समुद्रकिनाऱ्याकडे वळतात. मरिन लाइन्स, वरळी सी फेस, बँडस्टँड, माहिम, दादर अशा विविध ठिकाणी मुंबईकर आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची गर्दी असते. आपल्या आनंदासाठी, मौजमजेसाठी या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या असंख्य लोकांपैकी फार क्वचितच लोकांचे लक्ष या समुद्राच्या पोटात आणि किनाऱ्यालगत असणाऱ्या कचऱ्याकडे जाते. खरंतर ही परिस्थिती मनाला चटका लावून जाणारी आहे, कारण निसर्गाने आपल्याला जे देणे दिले आहे, त्याची आपण अक्षरश: नासधूस करत आहोत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चौपाट्या आता लवकरच चकाचक होणार आहेत. चौपाट्यांची साफसफाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी पालिका चक्क अकरा कोटी 60 लाख रुपये खर्च करणार आहे. दादर आणि माहीम चौपाटयांची साफसफाई करण्यासाठी पालिकेने मे. विशाल प्रोटेक्शन फोर्स या कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा पालिकेचा विचार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. पालिका या कामासाठी 11 कोटी 60 लाख रुपये खर्च करणार असल्याने चौपाट्या आता लवकरच चकाचक होणार आहेत त्यामुळे मुंबईकरांना लवकरच चौपाट्यांवर मज्जा लुटता येईल अशी चिव्ह सध्या पहायला मिळत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉग

News Desk

मुंबईत पेट्रोल नव्वदी पार

News Desk

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी केले बदल

News Desk
राजकारण

सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारचा समाचार

News Desk

मुंबई | आज (मंगळवारी) शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असून १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती .आज शिवसेनेला ५२ वर्ष पुर्ण झाली आहेत त्यानिमित्त ‘सामना’च्या अग्रलेखातून 2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होणार नाही असे म्हणत शिवसेनेने भाजपा वर निशाना साधला आहे. तर 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचीच सत्ता येईल असे म्हणत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

केंद्रात सत्तेवर कोण येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद शिवसेना राष्ट्रीय पातळीवर निर्माण करेल असा विश्वासही अग्रलेखातून व्यक्त केला आहे. दिल्लीतील आपचे आंदोलन, जवानांची हत्या, लोकशाहीच्या मुद्द्यावरून भाजपा व पंतप्रधान मोदींवर सामनाच्या अग्रलेखातून तोफ डागण्यात आली आहे. देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर सत्तेचा माज आम्हाला कधी चढला नाही आणि पुढेही आम्ही तो चढू देणार नाही.काश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे.

नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणे व राज्य चालविणे मुश्कील होईल’, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे . उत्तर भारतात ऊठलेल्या धुळीचा काणोसा घेत ‘धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत . मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळ्य़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. असा टोमना वजा सूचक इशारा भाजपला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Related posts

‘ते’ राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे !

News Desk

‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळाव्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

Aprna

“सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श असणार”, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Aprna