HW News Marathi
मुंबई

अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यास न्यायालयाचा नकार

नवी मुंबई | राज्यातील कोणतीही अनधिकृत बांधकामे अधिकृत करता येणार नाहीत, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एमआयडीसी आणि सिडकोच्या हद्दीतील येथील बेकायदा बांधकामप्रकरणी तेथील रहिवाशांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आला आहे.

“राज्य सरकारने एमआरटीपीमधील कलम ५२ (अ) मध्ये केलेली सुधारणा ही खरतर अवैध आहे. पण, आम्ही त्याला अवैध ठरवत नाही. मात्र, जी बांधकामे विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावलीच्या विरुद्ध असतील त्या बांधकामांना राज्य सरकार अभय देणार नाही”, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे एमआयडीसीच्या जागेवरील दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. दिघ्यातील इमारतींमध्ये सर्वसामान्य लोक राहतात त्यामुळे राज्य सरकारकडून माणुसकीच्या दृष्टीने दिघ्यातील बांधकामे नियमित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

घाटकोपर विमान दुर्घटना आणि ते दोघे

News Desk

लोकल अजूनही रुळांवर येईना!

News Desk

मोनोरेलमध्ये टक्कर , दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर

News Desk
क्रीडा

सचिन तेंडुलकरने केली धोनीची पाठराखण

swarit

नवी दिल्ली । भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने महेंद्र सिंग धोनीची पाठराखण केली आहे. T-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघातून माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आले, त्याची पाठराखण करताना सचिन म्हणाला की, ” धोनीला वगळण्यामागे निवड समितीची काय नेमकी मानसीकता आहे, हे मला माहिती नाही. त्याचबरोबर ड्रेसिंग रुममध्येही काय वातावरण आहे, हे मला माहिती नाही. पण धोनी हा क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारामध्ये चपखल बसणारा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला धोनीवर जी परिस्थिती आली आहे, ती माझ्यावरही आली होती. त्यावेळी मला जे काही करायचे होते ते केले. या परिस्थितीत धोनीला काय करायला हवे, हेदेखील त्याला चांगलेच माहिती असेल.”

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात धोनीला वगळले होते . त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होतात्यामुळे धोनीचे चाहते चांगलेच वैतागले होते.

Related posts

भारताने पाकविरूद्ध खेळावे की नाही, ते केंद्राला ठरवू दे !

News Desk

आशियाई क्रीडा स्पर्धेचे आज शानदार उद्घाटन

News Desk

‘आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन’ शिवाजी पार्कमध्ये साजरा होणार…

News Desk