HW News Marathi
मुंबई

अॅन्टॉप हिल परिसरात भिंत कोसळली

मुंबई | वडाळा येथील अॅण्टॉप हिल परिसरात संगमनगर येथे लॉएड संकुलाजवळ दोस्ती नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथील पार्किंग जवळची भिंत कोसळली आणि त्यात पाच गाड्या अडकल्या होत्या. अग्निशमन दलाने या अडकलेल्या गाड्या बाहेर काढल्या आहेत.

भिंत कोसळल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही परंतु ढिगाऱ्याखाली १५ गाड्या दबल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक होणार अंडरग्राऊड

News Desk

पावसामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या; विनोद तावडेंची माहिती

swarit

दादरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा संपन्न

News Desk
राजकारण

विधानपरिषद सदस्य आणि महामंडळ अध्यक्षपदांची रिपाइंची मागणी

News Desk

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्तेत रिपब्लिकन पक्षाला 5 टक्के वाटा मिळाला पाहिजे. त्यानुसार विधान परिषद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एक आमदार निवडून आणावा तसेच महामंडळाची 3 अध्यक्षपदे आणि 40 संचालक सदस्य पदे रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावीत तसेच राज्यसरकारमध्ये होणाऱ्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी जनतेतून दबाव वाढत असल्याने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या या मागणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप चे प्रदेश अध्यक्ष राबसाहेब दानवे तसेच सर्व वरिष्ठ भाजप नेत्यांनी विचार करावा असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले असून रिपब्लिकन पक्षाला राज्यात सत्तेतील सहभाग मिळाला पाहिजे याबाबत राज्यभरातून दबाव वाढत असल्याचे आठवलेंनी स्पष्ट केले आहे.

राज्यात महायुती चे सरकार स्थापन होऊन 4 वर्ष पूर्ण होत आले असून राज्य सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाचा एक ही प्रतिनिधी मंत्री नसल्याने आंबेडकरी समाजातुन रिपाइं च्या सत्तेतील सहभागाची मागणी वाढली आहे. सध्या विधानपरिषद सदस्य पदांची निवडणूक 16 जुलै रोजी होत असून त्यात भाजप च्या कोट्यातील 5 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रिपाइं ला एक विधानपरिषद सदस्यत्व मिळण्याची आग्रही मागणी करणार आहेत. तसेच महामंडळाची अध्यक्षपदे आणि सदस्य पदांमध्ये रिपाइं ला समाधानकारक सहभाग मिळावा अशी अपेक्षा ना रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे.

शिवसेना भाजप रिपाइं ने 2014 मध्ये महायुतीतून लोकसभा निवडणूक लढविली त्यानंतर शिवसेनेने वेगळे होत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक भाजप विरुद्ध लढविली त्यावेळी भाजप ला खंबीरपणे रिपब्लिकन पक्षाने साथ देत भाजप रिपाइं महायुतीतुन एकत्र निवडणूक लढविली होती. मात्र आता साडेतीन वर्ष देवेंद्र फडणवीस सरकार ला पूर्ण झाले तरी रिपब्लिकन पक्षाला राज्यात समाधानकारक सत्तासहभाग मिळाला नसल्याकडे आंबेडकरी जनतेतून असंतोष आहे. याबाबत भाजपने सकारात्मक विचार करून रिपब्लिकन पक्षाला राज्यात सत्ता सहभाग देण्याची अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली असून त्यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

Related posts

उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा, संप सुरूच !

News Desk

परळीचा आमदार मीच | धनंजय मुंडे

News Desk

RamMandir : असा असेल उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

News Desk