HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीतच

मुंबई | ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद लोकल सिग्नल तोडून पुढे गेली. त्यामुळे मोठा गोंधळ झाला असून जलद मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली. पण, या घटनेला तब्बल चार तास म्हणजे सायंकाळ होऊ न ही मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरी वाहतूक सुरळीत झाली नाही. यामुळे मध्ये रेल्वेने ठाणे आणि कुर्ला या लोकल ट्रेन रद्द करण्या आल्या आहे. तर लोकल ट्रेनच्या वेळा पत्रकावर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.

कामावरुन घराच्या दिशेने जाणा-या मुंबईकरांचे हाल होत आहे. ऐन गर्दीच्या वेळेत लोकल ट्रेन रद्द केल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीत वाढ होत आहे.

  • लोकल ट्रेनने सिग्नल तोडला

मध्य रेल्वेच्या घाटकोपर जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाला आहे. लोकलने सिग्नल तोडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या लोकल ट्रेनने सिग्नल तोडल्याचे कारण अद्याप कळाले नाही.

या गोंधळामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. अनेक लोकल विद्याविहार आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान अडकून पडल्यामुळे प्रवाशांना कडक उन्हात रेल्वे रुळामधून मार्ग काढात जवळील स्टेशनच्या दिशेने जावे लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१५ एप्रिलला रेल्वे सुरु होणार का? यावर रेल्वे प्रशासनाने दिले उत्तर

News Desk

अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचारप्रकरणी शिपाई अटकेत

News Desk

पुणे सदाशिव पेठेत 8 दुचाकी गाड्या जाळल्या

News Desk