HW News Marathi
मुंबई

नाणार प्रकल्पावर उद्धव मुख्यमंत्र्यात गुफ्तगु

मुंबईः कोकणातील नाणार प्रकल्पासाठी ७० टक्के ग्रामस्थांची मंजुरी आवश्यक आहे. परंतु जर त्यापेक्षा जास्त ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अाम्हाला दिले अाहे, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. या प्रकल्पाला शिवसेनेचा विराेध अाहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी प्रकल्पग्रस्तांसह ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान, सत्तेत एकत्र असूनही एकमेकांवर टीकेची एकही संधी न साेडणाऱ्या फडणवीस-ठाकरे यांच्या या भेटीचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात अाहेत.

‘नाणार येथे शिवसेनेच्या मंत्र्यांमुळेच रिफायनरी होत आहे’ असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यामुळे काेकणातील हक्काचा मतदार असलेलेे प्रकल्पग्रस्त शिवसेनेच्या विरोधात जात होते. शिवसेनेच्या एका गटाचा या रिफायनरीला विरोध होता. अशाेक वालम या स्थानिक कार्यकर्त्याने प्रकल्पाला विराेध करत कोकण रिफायनरी विरोध संघर्ष समितीची स्थापना केली हाेती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले, दोन जणांचा मृत्यू

swarit

लालबागमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट २० जण जखमी

News Desk

सुनंदा पुष्कर प्रकरणात सुब्रम्हण्यन स्वामींची याचिका फेटाळली

News Desk