HW News Marathi
मुंबई

नाणार प्रकल्पावर उद्धव मुख्यमंत्र्यात गुफ्तगु

मुंबईः कोकणातील नाणार प्रकल्पासाठी ७० टक्के ग्रामस्थांची मंजुरी आवश्यक आहे. परंतु जर त्यापेक्षा जास्त ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अाम्हाला दिले अाहे, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. या प्रकल्पाला शिवसेनेचा विराेध अाहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी प्रकल्पग्रस्तांसह ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान, सत्तेत एकत्र असूनही एकमेकांवर टीकेची एकही संधी न साेडणाऱ्या फडणवीस-ठाकरे यांच्या या भेटीचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात अाहेत.

‘नाणार येथे शिवसेनेच्या मंत्र्यांमुळेच रिफायनरी होत आहे’ असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यामुळे काेकणातील हक्काचा मतदार असलेलेे प्रकल्पग्रस्त शिवसेनेच्या विरोधात जात होते. शिवसेनेच्या एका गटाचा या रिफायनरीला विरोध होता. अशाेक वालम या स्थानिक कार्यकर्त्याने प्रकल्पाला विराेध करत कोकण रिफायनरी विरोध संघर्ष समितीची स्थापना केली हाेती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मेट्रोचे खांब उभारण्याची मागणी न्यायालयाने नाकारली

Gauri Tilekar

गोरेगाव स्थानकात तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

मुंबईत नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा १३ तासांपासून शोध सुरु

News Desk
राजकारण

वनगांची उमेदवारी अद्याप प्रतिक्षेत

News Desk

मुंबई : भाजपाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केलेले दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेकडून लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळणार की नाही या बाबत अद्याप शिकामोर्तब झालेले नाही. श्रीनिवास वनगा लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा आहे. परंतु शिवसेनेने मात्र अद्याप कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे वनगांना उमेदवारी मिळणार का असा संभ्रम निर्माण झाला आहे.

पालघर पोटनिवडणुकीसंदर्भात ‘मातोश्री’वर चर्चा सुरु होती. प्रत्येक पदाधिकारी, आमदार आणि खासदाराला पोटनिवडणुकीची विभागवार जबाबदारी देण्यात आली. परंतु या बैठकीनंतरही शिवसेनेने श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा केली नाही. वनगांचे पुत्र श्रीनिवास यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी पालघरमधील शिवसैनिकांनी केली आहे. शिवसेनेकडून श्रीनिवास यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांना निवडून आणू असा विश्वासही शिवसैनिकांनी वरिष्ठांना दिला आहे.

Related posts

#ElectionsResultsWithHW : आमची आघाडी जनतेच्या पसंतीस उतरली नाही !

News Desk

लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने ३ राज्यात भाजपने पराभव करुन घेतला ?

News Desk

“सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Aprna