HW News Marathi
मुंबई

साध्या वेषात मोहीम फत्ते !

मुंबई | पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते विरारदरम्यान लोकलच्या दरवाजात अडवणूक आणि दादागिरी करणाऱ्या टोळ्यांना आवर घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने मोबाईलवरील ‘व्हॉट्सअॅप’चा खुबीने वापर केला आहे. लोकलच्या डब्यात साध्या वेषात हे आरपीएफचे जवान चढत असून डब्यात चढू न देणाऱ्यांचे चित्रण लागलीच पुढच्या स्थानकातील आपल्या सहकाऱ्याला मोबाईलवरून पाठवून कारवाई करीत आहेत. दोन दिवसांत 28 प्रवाशांवर अशा प्रकारे रेल्वे अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे.

हे आरपीएफचे जवान साध्या पोशाखात डब्यात चढतात. जर गाडीत चढताना कोणी धक्का मारला किंवा दरवाजा अडविले की पहिली टीम खाली उतरते आणि त्याच्यासोबतचा जवान मोबाईलवर कॅमेऱ्याने धक्का मारणाऱ्यांचा फोटो काढून पुढच्या स्थानकावरील तैनात जवानाच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवरून पाठवितात. त्यानंतर गाडी त्या स्थानकावर पोहचल्यावर तेथे उभे असणारा स्टाफ संबंधित प्रवाशावर कारवाई करतात. अशा प्रकारे गुरुवारी १० जणांवर तर शुक्रवारी १८ जणांवर रेल्वे कायदा कलम १५६ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ आणि संध्याकाळच्या ‘पिक अव्हर’च्या गर्दीत पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवलीच्या पुढचा प्रवास काळजात धडकी भरविणारा असतो. या प्रवासावेळी विविध ग्रूपद्वारे प्रवाशांना गाडीत चढू दिले जात नाही किंवा उतरण्यास मज्जाव केला जातो. जर मधल्या स्थानकात उतरायचे असेल तर उतरू दिले जात नाही. तसेच मारहाण करण्यापासून ते प्रवाशाला गाडीतून ढलकण्यापर्यंतची प्रकरणे यापूर्वी घडलेली आहेत. आम्ही जवानांच्या विविध टीम स्थापन केल्या असून सकाळच्या वेळी विरार ते बोरिवली तर संध्याकाळी उलट दिशेला बोरिवली ते विरार अशी कारवाई सुरू आहे, असे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अनुप शुक्ला यांनी म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेवर सध्या दररोज १३५५ फेऱ्या चालविल्या जातात, तर दररोज ३६ लाख प्रवासी प्रवास करतात. १ नोव्हेंबरपासून आणखी १० फेऱ्यांची वाढ करण्यात येऊन एकूण १३६५ फेऱ्या चालविण्याचे नियोजन आहे. बोरिवली ते विरारदरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने ‘डोअर ब्लॉकिंग ड्राइव्ह’ चालविला जात असून त्यासाठी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांची मदत घेण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोरेगावत दोन गोदामांना भीषण आग ,15 जणांना बाहेर काढले

swarit

मोनोरेलमध्ये टक्कर , दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर

News Desk

कल्याणच्या कृष्णकुंज सोसायटीत झाला विवेकी विचारांचा जागर

News Desk
मनोरंजन

नाना पाटेकरांनी का रद्द केली पत्रकार परिषद ?

News Desk

मुंबई | ‘हॉर्न ओके प्लिज’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या गंभीर आरोपांवर नाना पाटेकर यांनी मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. नाना पाटेकर हे आज (8 आॅक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात आपली भूमिका मांडणार होते. परंतु नाना पाटेकर यांनी ऐनवेळेस पत्रकार परिषद रद्द केल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते.

नाना पाटेकर यांच्या वकिलांकडून तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नाना पाटेकर पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हणूनच त्यांची आजची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द केली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना पाटेकर यासंदर्भात नक्की काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तनुश्री दत्ताला नाना पाटेकर यांच्या वकिलांकडून नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी आपल्याला नानांकडून अशी कोणतीही नोटीस आलेली नसल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. तसेच नोटीस नाही पण धमक्या मात्र मिळत आहेत असा आरोपही तनुश्रीने केला आहे. तसेच तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यासोबत ‘चॉकलेट-डीप डार्क सिक्रेट’ या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर देखील गैरवर्तवणुकीचा आरोप केला आहे.

Related posts

महात्मा गांधींना नोबेल का मिळाला नाही ?

News Desk

Mahatma Gandhi Death Anniversary | महात्मा गांधींचे काही अत्यंत दुर्मिळ छायाचित्रे

News Desk

जाणून घ्या…कशा कराव्यात मूग-गव्हाच्या खुसखुशीत चकल्या

swarit