HW News Marathi
देश / विदेश

रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

नवी दिल्ली: भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून गुरुवारी रामनाथ कोविंद यांची निवड झाली. १७ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार कोविंद विजयी ठरले. संसद भवनात आज सकाळपासून ही मतमोजणी सुरू होती. यामध्ये कोविंद यांना ६५.३५ टक्के मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांना एकूण ३४.३५ टक्के मते मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यापैकी ९९ टक्के आमदार-खासदारांनी १७ जुलै रोजी मतदानाचा हक्क बजावला होता. रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर एनडीएच्या गोटात आनंदाला उधाण आले आहे. दिल्लीत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून रामनाथ कोविंद यांच्या विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा कोविंद यांना भेटण्यासाठी १० अकबर रोड येथील त्यांच्या तात्पुरत्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एमटीएनएलकडून नथुराम गोडसेचे समर्थन केले जात आहे का ?

News Desk

शेतकऱ्यांना दिलासा ! खतांच्या किंमती पूर्ववत केल्याचं मोदींनी केलं जाहीर, पवारांच्या मागणीला यश?

News Desk

नागालँडमधील बंडखोरांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

News Desk
मुंबई

मुंबई पोलिस वाय-फाय युक्त

News Desk

मुंबईः वाहतूक पोलिसांसह चालकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांच्या छातीवर वायफाय कॅमेरा लावण्यात येणार आहे. नेहमीच्या वॉकी-टॉकी आणि लवाजमाशिवाय पोलिसांना आता हा वायफाय कॅमेराही सोबत बाळगावा लागणार आहे. या कॅमेऱ्यात रस्त्यावरील पोलिसाचं प्रत्येक वाहनचालकांसोबतचं संभाषण रेकॉर्ड केलं जाईल आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग होईल.

त्यामुळे एखादा व्यक्ती पोलिसांशी जे काही संभाषण किंवा अरेरावी करेल ती सगळी रेकॉर्ड होऊन कंट्रोल रुमला जाईल. कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेली माहिती ग्राह्य धरली जाणार आहे.

Related posts

डोंबिवलीतलं अतिक्रमण पाडायला प्रशासनाला वेळ नाही

News Desk

अनोख्या पद्धतीने वैलेंटाइन डे साजरा

News Desk

चेंबूरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

News Desk