HW News Marathi
देश / विदेश

हाशिमपुरा नरसंहार प्रकरण | १६ पीएसी जवानांना आजन्म कारावास

लखनौ | मेरठमध्ये १९८७ साली हाशिमपुरा येथे झालेल्या नरसंहाराप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने तीस हजारी न्यायालयाचा निर्णयाविरुद्ध १६ पीएसी जवानांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. ३१ वर्षांपूर्वी २२ मे १९८७ साली मेरठमधील हाशिमपुरामध्ये ४२ लोकांची हत्या करण्यात आली होती. परंतु त्यावेळी आरोपी पीएसी जवानांविरोधात सबळ पुरावे नसल्याचे कारण देऊन तीस हजारी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि इतर पीडितांनी तीस हजारी न्यायालयाच्या या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने ६ सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण करून या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज दिल्ली उच्च न्यायालयाने १६ आरोपी पीएसी जवानांना दोषी ठरवीत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या एकूण १६ आरोपींपैकी २ आरोपींचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट

Aprna

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 59 टक्के मतदान

Aprna

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजेंचे पंतप्रधानांना दुसऱ्यांदा पत्र

News Desk
राजकारण

एकनाथ खडसे यांचा भाजपला घरचा आहेर

Gauri Tilekar

नंदुरबार | सातपुडा कारखान्यातील ४४व्या गळीत हंगामाचा शुभारंभ (आज) बुधवारी करण्यात आला. हा कार्यक्रम आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षापासून मंत्रीपदापासून दूर राहिलेल्या आमदार एकनाथ खडसे यांनी दुःख व्यक्त केले. एकनाथ खडसे यांनी ४४व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात वक्तव्य केले आहे. ‘अमरीशभाई, अच्छे दिन हमारे भी आयेंगे..’ असे यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

पुढे एकनाथ खडसे म्हणाले, “मला राजकारणात आणि समाजात येऊन ४० वर्ष झाली. या ४० वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही, एकही गुन्हा माझ्या नावावर दाखल झालेला नाही. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नाहीत. भाजप सत्तेवर यावी म्हणून रक्ताचे पाणी केले, कष्ट केले पण सत्ता मिळताच मला मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. माझे काय चुकले ?” एकनाथ खडसे आपल्या डोक्यावरची टोपी फिरवत म्हणाले कि, डोक्यावरची टोपी मी फिरवतो परंतु राजकारणात कधी टोपी फिरवणार नाही. “अच्छे दिन हमारे भी आयेंगे” असे म्हणत त्यांनी आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या आहेत. त्यानंतर या कार्यक्रमात आमदार अमरिशभाई पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले.

Related posts

राज्यकर्ते ज्या विकासाचे श्रेय घेत आहेत तो विकास कोणता ? – ठाकरे

News Desk

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत दया !

News Desk

काँग्रेसची सातवी यादी जाहीर, जालन्यातून विलास औताड यांना उमेदवारी

News Desk