जगतियाल | तेलंगणामधील जगतियालमध्ये आज (११ सप्टेंबर) रोजी बसचा भीषण अपघात झाला आहे. कोंडागट्ट घाटात राज्य परिवहन निगमची बस उटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या अपघातात आतापर्यंत २० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंधू शर्मा यांनी दिली आहे.
#UPDATE: Sindhu Sharma, SP Jagtial, says, "45 people have died so far. Injured have been admitted to nearby government hospitals. Rescue operation is underway." A state-run RTC bus accident had occurred near Kondaagattu, earlier today. #Telangana pic.twitter.com/VRW1Q8FaCC
— ANI (@ANI) September 11, 2018
या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. बसचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बस हनुमान मंदिर येथून जगतियाला जात असताना रस्त्या येणाऱ्या कोंडागट्टच्या घाटात हा अपघात झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला असून अपघातात मृतांच्या नातेवाईकांना सरकार पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना चांगले उपचार देण्याचे आदेश दिले आहे.
Kondagattu bus accident: Telangana Chief Minister K Chandrashekhar Rao announces Rs 5 lakh as ex-gratia to the family members of the deceased https://t.co/1rOzUevWyT
— ANI (@ANI) September 11, 2018