HW News Marathi
देश / विदेश

तेलंगणामधील कोंडागट्ट घाटात बस कोसळून ४५ प्रवाशांचा मृत्यू

जगतियाल | तेलंगणामधील जगतियालमध्ये आज (११ सप्टेंबर) रोजी बसचा भीषण अपघात झाला आहे. कोंडागट्ट घाटात राज्य परिवहन निगमची बस उटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या अपघातात आतापर्यंत २० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंधू शर्मा यांनी दिली आहे.

या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. बसचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बस हनुमान मंदिर येथून जगतियाला जात असताना रस्त्या येणाऱ्या कोंडागट्टच्या घाटात हा अपघात झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला असून अपघातात मृतांच्या नातेवाईकांना सरकार पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना चांगले उपचार देण्याचे आदेश दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खासदार नवनीत राणा याचं जात प्रमाणपत्र अवैध, मुंबई उच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

News Desk

हार्दिक पटेलने घेतली प्रवीण तोगडियांची भेट

swarit

एटीएसमुळं कर्करोग झाला – साध्वी प्रज्ञासिंह

News Desk
महाराष्ट्र

मागासवर्गीय आयोगाने १५ नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय द्या | हायकोर्ट

swarit

मुंबई | मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाला १५ नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी हायकोर्टात सुनावाणी दरम्यान मागासवर्गीय आयोगाने आपला प्रगती अहवाल हायकोर्टात सादर केला. तसेच हायकोर्टाने चार आठवड्यांनी पुन्हा एकदा कामकाजाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अंतिम अहवाल हा १५ नोव्हेंबरला सादर करणार असल्याची माहिती आयोगाने हायकोर्टाला दिली.

विनोद पाटील यांनी आयोगाला काल मर्यादा निश्चित करून देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेनुसार नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी या याचिकेत केली आहे. ऑगस्ट महिन्यात मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले होते.

मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक महिन्यांपासून मागासवर्गीय आयोगाकडे प्रलंबित आहे. आणि अद्याप कुठलेही ठोस काम दिसत नसल्याने आयोगाने आणि राज्य सरकारने वेळमर्यादेच्या आत पडताळणी करून मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने लावावा. ही वेळमर्यादा उच्च न्यायालयाने निश्चित करावी, तसेच आगामी शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा घेता येईल.अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

 

 

Related posts

बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा राजीनामा

News Desk

उद्या होणारा दसरा मेळावा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा – पंकजा मुंडे

News Desk

चित्रा वाघ यांनी दबावापोटी भाजपत जाण्याची परवानगी मागितली !

News Desk