HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये निवडणुकीपुर्वीच दहशतवादी हल्ल्याची शक्यता

श्रीनगर | भारत-पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात घुसखोरी करण्यासाठी जवळपास २५० दहशतवादी तर काश्मीर खोऱ्यात ३०० दहशतवादी सक्रीय असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सोमवारपासून चार टप्प्यांत या स्थानिक निवडणुका पार पडणार आहेत. मात्र या निवडणुकांच्या एक दिवस आधीच निवडणुकीमध्ये बाधा आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.

पाकिस्तानच्या या कटाची माहिती मिळताच भारतीय जवानांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यावेळी दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्यामुळे लष्कर, पोलीस दल, सीआरपीएफ अशा सर्व सुरक्षा दलांना सुद्धा सावध राहण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. तसेच उमेदवारांवरही हल्ले होण्याची शक्यता असल्याने त्यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी सुरक्षा दलांना तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले असून वाहने आणि संशयित व्यक्तींवर कडक नजर ठेवण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडू नये यासाठीच पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर हालचाली होत असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फ्रान्सहून रवाना झालेले राफेल अवघ्या काही तासात भारतात होणारं दाखले !

News Desk

पंजाबी सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या

Aprna

कश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो!

News Desk
मुंबई

नालासोपारा स्फोटक प्रकरणात गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपींचा समावेश

Gauri Tilekar

मुंबई | नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपी समोर येताच, महाराष्ट्र एटीएसने कर्नाटकच्या विशेष पथकाने पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी अमोल काळेसह, अमित बिड्डे, गणेश मिस्कीन अशा तिघांचा ताबा शनिवारी घेतला आहे. विशेष न्यायालयाने तिघांना १२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नालासोपारा आणि राज्यात ठिकठिकाणी छापे टाकून स्फोटके आणि शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरसह, शरद कळसकर, अविनाश पवार, वासुदेव सूर्यवंशी आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उखडूर्ली लोधी,सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांनाही अटक केरण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीमध्ये हा स्फोटकांचा साठा पुणे येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात करण्यासाठी वापरण्यात येणार होता, अशी माहिती पुढे आली आहे. अमोल काळे, अमित बिड्डे आणि गणेश मिस्कीन या तिघांच्या चौकशीतून आणखी बरीच माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे याला अमोल काळे यानेच पिस्तुल पुरविल्याची माहिती याआधी सीबीआयच्या वतीने न्यायालयात देण्यात आली होती. तर सूर्यवंशीने गुन्ह्यात कर्नाटकच्या धारवडमधून वाहने चोरी केली होती. या चोरीत सचिन अंदुरे, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी या तिघांचाही सहभाग असल्याने तिघांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याची मागणी केली आहे. आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी याला विरोध केला आहे. चोरी प्रकरणावेळी तिघेही न्यायालयीन कोठडीत होते. त्यामुळे त्यात त्यांचा सहभाग असणे शक्य नाही. त्यामुळे न्यायालयाने तिघांना ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Related posts

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपत घोषणाबाजी

News Desk

कुर्ल्यात महापालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे रास्तारोको आंदोलन

News Desk

चुकीचा अर्थ काढणा-यांना साईबाबा सद्दबुध्दी देवो | सुधीर मुनगंटीवार

News Desk