HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये मिनिबस दरीत कोसळून २० जणांचा मृत्यू

जम्मू | श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरून बनिहालहून रामबनच्या दिशेने जात असलेली मिनिबस दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनिबसवरील केलामोठ येथील दरीत कोसळली माहिती मिळाली आहे. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत.घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्यास सुरू केले असून जखमींनां उधमपूर येथील सैनिकी रुग्णालयात दाखल केले आहे.

जेके १९,१५९३ नंबरची ही मिनिबस बनिहाल येथून रामबनच्या दिशेने जात होती. या बसमधून एकूण ३२ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यास सुरू केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ईशान्य भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल

swarit

राफेल डीलसाठी मोदी सरकारकडूनच रिलायन्सची निवड | फ्रान्स्वा ओलांद

swarit

‘टाईम’च्या मुखपृष्ठावर पंतप्रधान मोदींचा वादग्रस्त उल्लेख

News Desk
राजकारण

इंधन दर कपातीनंतर अरुण जेटलींचे विरोधकांना प्रत्युत्तर

Gauri Tilekar

नवी दिल्ली | काही दिवसात दिवसात इंधनाच्या किंमतींमध्ये दर दिवशी वाढ होत होती. त्यामुळे विरोधी पक्षांकडून वारंवार टीका होत होती. काँग्रेसने तर भाजप सरकारच्या काळात सातत्याने वाढणाऱ्या महागाई विरोधात काँग्रेससह इतर २१ पक्षांनी १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाकही दिली होती. अखेर गुरुवारी (४ ऑक्‍टोबर) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून इंधनाच्या उत्‍पादन शुल्‍कात प्रतिलिटर दीड रूपयांनी कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता मात्र अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले अर्थमंत्री अरुण जेटली ?

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरल्याने, कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने देशातील इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याबाबतच माहिती देताना अरुण जेटली म्हणाले आहेत कि, “व्हेनेझुएला आणि लिबियातील राजकीय संकटामुळे या देशातील तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून अमेरिकेने इराणवर लादलेल्या व्यापारी निर्बंधांमुळे तेलाच्या पुरवठ्यामधील निश्चितता कमी झाली आहे. यामुळे इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे.” त्याचप्रमाणे “तेलाच्या वाढत्या किमतींचा फायदा उठवत सर्वच विरोधी पक्षांनी सरकारवर वारंवार टीका केली. मात्र आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी मौन बाळगले आहे.” असेही अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

देशासह राज्‍यात देखील पेट्रोल ५ रुपयांनी स्‍वस्‍त होणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेच्या प्रत्‍यक्ष अंमलबजावणीत पेट्रोलच्या किंमतीतील कपात ही केवळ ४ रूपये ३५ पैसे एवढीच झाली असल्याचे लक्षात आले आहे. “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींतील वाढीमुळे निर्माण झालेले दरवाढीचे आव्हान विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सोशल मीडियावरून होणाऱ्या टीकेमुळे कमी होणार नाही,” असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related posts

भाजपकडून सनी देओल गुरुदासपूर, तर किरण खेर यांना चंदीगडमधून उमेदवारी

News Desk

भारताला जगामध्ये ना मर्द म्हटले जाईल | संजय राऊत

swarit

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा हा मोठा निर्णय, आम्ही मुर्मूंचे स्वागत करतो! – मुख्यमंत्री

Aprna