HW News Marathi
देश / विदेश

अनिल अंबानींकडून काँग्रेस, नॅशनल हेरॉल्डविरुद्धचा मानहानीचा खटला मागे

नवी दिल्ली | राफेल कराराच्या मुद्द्यावरून उद्योगपती अनिल अंबानी यांनी काँग्रेसचे नेते आणि ‘नॅशनल हेरॉल्ड’ या वृत्तपत्राविरुद्ध केलेला पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला मागे घेतला आहे. नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रात राफेल करारासंदर्भात लिहिलेल्या लेखाविरुद्ध खोटी आणि अवमानकारक माहिती छापल्याप्रकरणी रिलायन्स समूहाकडून अहमदाबाद येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता रिलायन्स समूहाने हा खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही प्रतिवाद्यांना त्यांच्याविरुद्धचे खटले मागे घेतल्याचे सांगितले आहे, अशी माहिती अनिल अंबानी यांचे वकील राकेश पारीख यांनी न्यायालयात दिली आहे. रिलायन्स समूहाने काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्ड विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात कामकाजही सुरु होते. दरम्यान, न्यायालयाच्या सुट्ट्या संपल्यानंतर हा खटला मागे घेण्यासाठीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे नॅशनल हेरॉल्ड आणि काँग्रेस नेत्यांचे वकील पी. एस. चंपानेरी यांनी स्पष्ट केले आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्सने काँग्रेस नेते सुनील जाखड, रणदीपसिंह सुरजेवाला, ओमन चांडी, अशोक चव्हाण, अभिषेक मनु सिंघवी, संजय निरूपम या नेत्यांविरोधात तसेच नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. यात काही पत्रकारांचाही यामध्ये समावेश होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दोन दिग्गजांवर आज होणार अंत्यसंस्कार

swarit

Budget 2022: अर्थसंकल्पानंतर ‘या’ गोष्टी झाल्या स्वस्त

Aprna

एअर इंडियाच्या विमानची मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

swarit
देश / विदेश

कुलगाममध्ये सुरु असलेल्या चकमकीत १ दहशतवाद्याचा खात्मा

News Desk

कुलगाम | जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (२२ मे) मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान, या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्या असून या परिसरात सध्या शोध मोहीम सुरु आहे.

कुलगाममधील गोपालपोरामध्ये मंगळवारी (२२ मे) मध्यरात्रीपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अद्याप ही चकमक सुरु असून सुरक्षा दलाचे जवान परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ | ट्रम्प

News Desk

हरियाणाच्या सुषमा स्वराज यांची रंजक प्रेम कहाणी

News Desk

पंकजा मुंडेंना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये मिळणार संधी ! फडणवीसांची दिल्ली वारी….

News Desk