HW News Marathi
देश / विदेश

या ट्रेलरनंतर पिक्चर कधी रिलीज करायचा ते सैन्याचे नेतृत्व ठरवेल !

मुंबई | “भारतीय वायू दलाची ही कारवाई म्हणजे भारतीय सैन्याच्या क्षमतेची केवळ झलक आहे. या ट्रेलरनंतर पिक्चर कधी रिलीज करायचा ते सैन्याचे नेतृत्व योग्यवेळी ठरवेल”, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करत अभिनंदन केले. भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पहाटे ३.३० च्या सुमारास तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले.

भारतीय वायुदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेल्या धाडसी कारवाईबद्दल धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सभागृहात भारतीय वायुदलाचे अभिनंदन केले. “पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. कोणतेही राजकारण न करता देशातील जनता आणि सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीशी मागे उभे राहिले आहेत”, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

भारतीय वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. जवळजवळ 300 दहशतवादयांचा खात्मा करून आपली सर्व विमाने सुखरूप परतली. यामध्ये जैश ए मोहम्मद, हिजाबुल मुझाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे. देशाच्या सार्वभौमतेच्या रक्षणासाठी यापुढेही आपण सर्वजण भारतीय सैन्याच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहिले पाहिजे, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बसपाची दुसरी यादी जाहीर

News Desk

भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटाला यांचे कोरोनामूळे न्युयॉर्कमध्ये निधन

News Desk

जम्मू- काश्मीरमध्ये तीन जवानांना हौतात्म्य

News Desk