HW News Marathi
देश / विदेश

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूसह दोन जण दोषी, तर दोघांची सुटका

जोधपूर | अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूरच्या SC-ST न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने हॉस्टल वॉर्डन शिल्पा व हॉस्टल डायरेक्टर शरद यांना आसाराम बापूसह दोषी ठरवले आहे. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना बलात्कार प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली. थोड्याच वेळात आसाराम बापूच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे.

आसाराम बापू हे गेल्या पाच वर्षापासून जोधपूर तुरुंगाची हवा खात आहेत. आसाराम भारतीय दंडविधान कलम 342, 376, 354-अ, 506, 509/34, जेजे अॅक्ट 23 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला इंदूरमधून 31 ऑगस्ट 2013 रोजी अटक केले होते. तेव्हापासून आसाराम बापू जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.

Related posts

अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरीला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात केला ठार; जो बायडनचा दुजोरा

Aprna

आज कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवरून परतणार मायदेशी, संपूर्ण भारताचे लक्ष

News Desk

तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त करण्याची राज्यपालांकडे शिफारस

News Desk
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला… शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ !

Adil

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारने राज्यातील शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. पण, त्यापैकी काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. २००८ मध्ये राज्यात कर्जमाफी योजनेतील लाभापासून वंचित राहिलेल्या अशा २००१ ते २००९ पर्यंतच्या थकीत असलेल्या शेतकरी खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

२००१६ ते २०१७ मधील जे थकीत खातेदार आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवदेन दिले आहे. फडणवीस म्हणाले, ‘शेतकरी, कष्टकरी व आदिवासींच्या संघटनांनी शासनाला सोमवारी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मागण्यांबाबत मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली.’

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील ठळक मुद्दे

  • 2001 ते 2009 मधील थकित खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय.
  • मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना येथे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी 396 कोटींचा खर्च आणि आवश्यक पदांस मान्यता.
  • बृहन्मुंबईतील शासकीय जमिनींवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासंबंधीच्या धोरणात सुधारणा करण्यास मान्यता.
  • भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित-विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याचा निर्णय.
  • कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळावर निवडणुकीसाठी व्यापारी व अडते या घटकातील मतदार होण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम-1963 मध्ये सुधारणा.
  • राज्य कामगार विमा योजनेसाठी राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय.
  • यवतमाळ जिल्ह्यातील देवधर (ता. राळेगाव) येथील बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणीची शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड.
  • वन विभागातील योजना-योजनेत्तर फंडातून वेतन घेणाऱ्या आणि नियमित करण्यास पात्र असणाऱ्या उर्वरित 569 कामगारांना कायम करण्याचा निर्णय.
  • भूमिगत नळमार्ग टाकणे आणि भूमिगत वाहिन्या बांधण्यासाठी जमिनीमधील वापर हक्काचे संपादन करण्यासह त्यांच्याशी संबंधित इतर बाबींसाठी तरतूद करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय.

Related posts

नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी !  गुलाबराव पाटलांची बोचरी टीका

News Desk

“आपला प्रवास खडतर, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे” – राज ठाकरे 

News Desk

बीडमध्ये शिवसेना आक्रमक! किरीट सोमय्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड

Aprna