HW News Marathi
देश / विदेश

अटलजींना आहेत हे आजार…

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सध्या फार नाजूक आहे. ते ९३ वर्षांचे आहेत. त्यांना सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशियासारखा आजाराने ग्रासले आहे. या व्यतिरिक्त ते किडनीच्या आजाराने आजाराने देखील त्रस्त आहेत. अटलजींवर ११ जून २०१८ पासून दिल्ली स्थित एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु बुधवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याचे एम्स रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे.

डिमेंशिया या आजाराविषयी थोडक्यात…

डिमेंशिया हा एक असा आजार आहे ज्याच्यामध्ये व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होते. यामध्ये व्यक्ती स्वतःची रोजची कामे देखील नीट करू शकत नाही. डिमेंशिया झालेल्या व्यक्तींमध्ये अनेकदा शॉर्ट टर्म मेमरी लॉस प्रमाणे वेगळी लक्षणे पाहायला मिळतात. डिमेंशिया झालेल्या व्यक्तीमध्ये ६० ते ८० टक्के केसे या अल्झायमरच्या असतात.

डिमेंशिया झालेल्या व्यक्तींच्या स्वभावातही अनेक बदल होतच राहतात. अशा व्यक्ती सतत उदास आणि दुःखी असतात. डिमेंशिया झालेल्या व्यक्तीची प्रकृती दिवसेंदिवस खालावते. डिमेंशिया झालेल्या व्यक्ती अनेकदा सामान्य व्यक्तींपेक्षा विचित्र वागू लागतात.

किडनी संक्रमणामुळे वाजपेयी त्रस्त

अटल बिहारी वाजपेयी यूरिन इन्फेक्शन आणि किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांची एकच किडनी काम करत आहे. ११ जून रोजी २०१८ रोजी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचे डायलिसिस करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.२००९ मध्ये त्यांना स्ट्रोक आल्यानंतर त्यांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता फार कमी झाली. त्यात डिमेंशियाने त्रस्त असल्यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. त्यानंतर अटलजींनी स्वतःला सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना व्हायरस’च्या भितीने पंतप्रधान मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

swarit

सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यावेळी जिवंतच होते

News Desk

५० टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह ‘या’ राज्यांत शाळा सुरू होणार

News Desk