HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, ९ जण ठार तर ११ जण जखमी

इस्लामाबाद | जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरुवारी (१४ फेब्रुवारी) सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्यात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने घेतली. तर आता पाकिस्तानच्या सैन्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्यातील ९ जण ठार झाले आहे, तर ११ जण जखमी झाले आहेत.

या हल्ल्याची जबाबदारी बलुच राजी अजोई संगर या संघटनेने स्वीकारली आहे. स्वतंत्र बलुचिस्तान ही या संघटनांची मागणी आहे. आमच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या गस्ती पथकावर आणि त्यांच्या तळावर एकाच वेळी हल्ला केला असल्याची माहिती माहिती बलुच राजी अजोई संगरचे प्रवक्ते बलोच खान यांनी दिली आहे.

या हल्ल्याची माहीती द बलुचिस्तान पोस्ट या वृत्तपत्राने दिली आहे. या हल्यामुळे आता जम्मू काश्मीर भारतीय उपखंडातील तणाव वाढला असल्याचे बोलले जात आहे. सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान रविवारी (१७ फेब्रुवारी) पाकिस्तानाच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या पोहोचण्याच्या काही तास आधी हा हल्ला झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात

News Desk

आता फक्त १५३ रुपयात पाहा टीव्ही चॅनेल्स

News Desk

कामगार संघटनांचा आज ‘भारत बंद’

News Desk