HW News Marathi
देश / विदेश

वाजपेयींच्या निधनाच्या तारखेबाबत संभ्रम | संजय राऊत

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेबाबत संभ्रम असल्याचे सांगितले आहे. वाजपेयींचे निधन १६ ऑगस्ट रोजी झाले कि त्यादिवशी केवळ त्यांच्या निधनाची घोषणा झाली, याबाबत संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनादिवशी तिरंगा अर्ध्यावर उतरवू शकत नाही तसेच पंतप्रधान त्यादिवशीच्या नरेंद्र मोदींच्या भाषणावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणूनच वाजपेयींच्या निधनाची घोषणा १६ ऑगस्ट रोजी करण्यात आली, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना किडनी संसर्गामुळे ११ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती एम्स रुग्णालयाच्या मिडिकल बुलेटिनमधून मिळत होती. अखेर १६ ऑगस्ट रोजी संध्यकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतल्याची घोषणा करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मेट्रोमधून अपहरण करून तरुणीवर बलात्कार

News Desk

भाजपनेचं उदयनराजेंचा साताऱ्यात पराभव घडवून आणला, राऊतांचा खळबळजनक खुलासा..

News Desk

उत्तर प्रदेशात ब्राम्हणांवर अत्याचार | मायावती

swarit
राजकारण

भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना गडकरींचा घरचा आहेर

News Desk

नागपूर | भाजप कार्यकर्त्यांचे वर्तन हे खरोखरीच अटलजींना अपेक्षित वर्तन आणि विचारांसारखे आहे का? असा प्रश्न विचारत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना घरचा आहेर दिला आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि नेते हे ‘माझ्या गळ्यात लहान हार का घातला ह्यापासून मला फक्त चहाच का दिला, बिस्कीट का नाही?’ अशा कोणत्याही क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालत असतात असेही त्यांनी सुनावले.

भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांच्या संकुचित मनाने अटलजींच्या विचारांवर आपल्याला कसे काय चालता येईल असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना विचारला. अटलजींसारखे आपण खरोखरच आहोत का याचा कार्यकर्त्यांनी विचार करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी करीकर्त्यांना दिला. नागपुरात दिवंगत पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.

Related posts

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

युती करायची की नाही हे जनता ठरवेल !

News Desk

राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले ?

News Desk