HW News Marathi
देश / विदेश

वाजपेयींच्या निधनाच्या तारखेबाबत संभ्रम | संजय राऊत

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेबाबत संभ्रम असल्याचे सांगितले आहे. वाजपेयींचे निधन १६ ऑगस्ट रोजी झाले कि त्यादिवशी केवळ त्यांच्या निधनाची घोषणा झाली, याबाबत संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिनादिवशी तिरंगा अर्ध्यावर उतरवू शकत नाही तसेच पंतप्रधान त्यादिवशीच्या नरेंद्र मोदींच्या भाषणावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणूनच वाजपेयींच्या निधनाची घोषणा १६ ऑगस्ट रोजी करण्यात आली, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना किडनी संसर्गामुळे ११ ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती एम्स रुग्णालयाच्या मिडिकल बुलेटिनमधून मिळत होती. अखेर १६ ऑगस्ट रोजी संध्यकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतल्याची घोषणा करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थमंत्र्यांसह मोदी सरकार खोटारडे | राहुल गांधी

Gauri Tilekar

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामधील राज्याच्या सहभागी नागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु !

swarit

पर्रिकर यांच्या निधनाने जननेता, सच्चा देशभक्त हरपला: मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

News Desk