HW News Marathi
देश / विदेश

केरळमधील महापुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू

तिरुअनंतपुरम | सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळमधील पुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. पावसाचा जोर आज (रविवार) कमी झाला आहे. पाऊस कमी झाल्यामुळे पावसाचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. परंतु अनेक जिल्ह्यात परिस्थिती जैसे थेच आहे. केरळ प्रशासनाने १४ जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला होता, मागे घेतला आहे.

पुरातमध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे काम एडीआरएफ टीमच्या वतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफने आतापर्यंत १० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पूरग्रस्थांच्या मदतीसाठी वायुसेनाही दिवसरात्र काम करत आहे. तसेच पूरग्रस्थांना खाण्यापिण्याच्या वस्तू पुरवण्याचे काम ही वायुसेनेकडून केले जात आहे. आतापर्यंत केरळमध्ये एनडीआरएफच्या ५० टीम बचावकार्यस मदत करत आहेत.

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून ५०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केरळमधील पूरपरिस्थतीची हवाई पाहणी देखील केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्रोच्या कार्यालयाला आग

News Desk

आधार कार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी केंद्र सरकारने काढले ‘हे’ नवे आदेश; जाणून घ्या…!

Aprna

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर यशस्वी बायपास शस्त्रक्रिया

News Desk