HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसची मोदी सरकारविरोधात ‘भारत बचाव रॅली’

नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात रामलीला मैदानात ‘भारत बचाव रॅली’ आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचित पाटलेट, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह अन्य दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. रामलीला मैदानात काँग्रेसच्या या रॅलीसाठी भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे सगळेच नेते या भव्य रॅलीला उपस्थित आहेत.

या रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार तयारी केली आहे. रामलीला आणि दिल्लीत सर्वत्र काँग्रेसचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. एकप्रकारची वातावरण निर्मिती काँग्रेसकडून केली जात आहे. रामलीला मैदानात काँग्रेसचे झेंडे आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोस्टर्सवर सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो दिसत आहेत. मोदी सरकारविरोधात आज (१३ डिसेंबर) दुपारी काँग्रेसकडून हे आंदोलन केले जाणार आहे. दुपारी १२ वाजताची या आंदोलनाची वेळ आहे. भाजपच्या हुकूमशाही सरकारविरोधात दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपने सुरु केलेली तानाशाही चालणार नाही, असे ट्वीट राहुल गांधींनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इस्रोचा नवीन इतिहास – अंतराळात भारताचे १०० उपग्रह

News Desk

हाथरस प्रकरणी CBIने दाखल केला ‘हत्येचा गुन्हा’, तपास सुरु

News Desk

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दानवेंच्या घरी महत्वाची बैठक!

News Desk
देश / विदेश

बलात्काऱ्यांना २१ दिवसांत फाशी, विधानसभेत ‘दिशा विधेयक’ मंजूर

News Desk

आंध्र प्रदेश। महिलांचा सुरक्षेच्या दृष्टीने आंध्र प्रदेश सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आंध्रच्या विधानसभेत दिशा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकानुसार बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला २१ दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. बलात्काराची एफआयआर दाखल झाल्यानंतर ७ दिवसांत तपास आणि पुढील १४ दिवसांत खटला संपविण्यात येणार आहे. या प्रकरणांसाठी १३ जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ आणि महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.

हैदराबाद शहराबाहेर तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या भीषण घटनेनंतर आंध्र प्रदेश सरकारने हे विधेयक विधानसेभेत मांडले. त्यानंतर हे विधेयक बहुमताने मंजूर झाले. राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी महिलेंच्या सुरक्षिततेकरीता या कायद्याला मंजूरी दिली. तर हैदराबाद घटनेतील पीडिताच्या नावावर आधारित या कायद्याला, आंध्र प्रदेश दिशा कायदा, असे नाव ठेवण्यात आले आहे.जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची प्रशंसा केली होती. तर देशातील काहींनी या एन्काऊंटरला विरोध केला होता. तर काहींनी पोलिसांच्या कृतींचे समर्थन केले आहे.

Related posts

निवडणूक आयोग हा दात नसलेला वाघ 

News Desk

गेल्या २८ दिवसांमध्ये देशातील १५ जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

News Desk

दहशतवाद्यांनी केले काश्मीरमधील पोलिसांच्या नातेवाईकांचे अपहरण

swarit