HW News Marathi
देश / विदेश

केरळमध्ये साथीच्या रोगांमुळे नागरिक त्रस्त

तिरुवनंतपूरम | केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता तेथे आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. केरळमध्ये आलेल्या पुरामुळे रोगराई प्रचंड प्रमाणात फोफावली आहे. आतापर्यंत दूषित पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या रोगांमुळे ५० जणांचा मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यामुळे केरळ राज्यात लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरली आहे. लेप्टोस्पायरोसिसमुळे ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे लेप्टोस्पायरोसिसग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ही अतिशय गंभीर बाब आहे.

तसेच केरळमध्ये डेंग्यूमुळे एक जण दगावला आहे. केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपासून एकूण १५९ जणांना लेप्टोस्पायरोसिस या रोगाने ग्रासले आहे. तर आतापर्यंत पुरामुळे १०४ लोकांना डेंग्यू आणि ५० हून अधिक जणांना मलेरिया झाला आहे. केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे ३८५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १० लाखांहून जास्त लोक विस्थापित झाले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर केरळमध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आधीच वर्तविली जात होती. त्यावेळी देशाच्या विविध राज्यांतून डॉक्टर्सच्या टीम केरळला रवाना केल्या गेल्या होत्या. . मुंबई-पुण्यातून देखील वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह ८१ डॉक्टरांची टीम केरळला रवाना करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसे राहुल गांधीच्या भेटीला

News Desk

वह्या, पुस्तकांना प्लास्टिक कव्हर नकोत | दिल्ली सरकार

News Desk

कर्नाटक निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात….

News Desk