HW News Marathi
Covid-19

कर्जाच्या हप्त्याची वसुली पुढचे ३ महिने स्थगित करा ,RBI चा बॅंकांना सल्ला

मुंबई| कोरोनामुळे देशाला आर्थिक संकटाची झळ बसत असतानाच सुमारे ८० कोटी जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १ लाख ७० हजार कोटी रुपये खर्चाचे काल ‘पॅकेज’ जाहीर केले. त्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे.

रेपो रेटमध्ये ०.७५ बेसिस पॉइंटने कमी करून ४.४% करण्यात आला असून, रिव्हर्स रेपो दरातही ९० बेसिस पॉईंटने कमी करून ४ % झाला आहे, अशी माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. कर्जावरील व्याजदर ५.१५ वरून ४.४ टक्क्यांवर करण्यात आलीये अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरात देखील कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्याजदर कमी झाल्याने कर्जाच्या हफ्त्याची रक्कम कमी होणार आहे. कोरोनामुळे मागणी कमी होऊन महागाई वाढण्याची शक्यता देखील शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलीये. कर्जाच्या हप्त्याची वसुली ३ महिने स्थगित करा,असा सल्ला आरबीआय गव्हर्नर यांनी बॅंकांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात ‘म्युकरमायकोसिस’वर शहरी गरीब योजनेतून उपचार ! महापौर मोहोळ

News Desk

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते, तेव्हा… !

News Desk

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

News Desk