HW News Marathi
देश / विदेश

सुप्रसिद्ध लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन

लंडन | नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे वयाच्या ८५ वर्षी निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नायपॉल यांच्या कुटुंबीयांकडून शनिवारी त्यांच्या मृत्यूबाबत माहितील देली. विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांनी ३० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.

नायपॉल यांना २००१ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. विद्याधर यांचा जन्म त्रिनिनाद येथे झाला होता. ‘अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास’ ही त्यांच्या साहित्यातील सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांचे अर्धआत्मचरित्रच आहे. या पुस्तकात कॅरेबियाई देशांमध्ये आलेल्या भारतीय प्रवाशांचे वर्णन केले आहे. भारतीय प्रवाशांनी कॅरेबियाई देशातील संस्कृतीशी आपलीशी केल्याचे वर्णय या पुस्तकात केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देश भाजप नाही आरएसएस चालवत आहे | सावित्रीबाई फुले

News Desk

खासदारांचे वेतन घ्या पण खासदार निधी कापू नका, नवनीत राणांची मागणी

News Desk

केरळमध्ये एअर इंडियाचं विमान रन वेवरुन काल घसरले, १८ जणांचा मृत्यू तर विमानाचे झाले २ तुकडे 

News Desk
महाराष्ट्र

भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा जिल्हाशी संपर्क तुटला

News Desk

गडचिरोली | सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला असून, पुलावरुन ३ फूट पाणी वाहू लागल्याने तालुक्यातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.मागील पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. धानपिकाची रोवणी केलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या स्त्रोतामधून पाणी आणून पीक वाचविण्याची धडपड करावी लागली, तर ज्यांची रोवणी करावयाची होती, त्यांच्यापुढे दुष्काळाचे सावट उभे राहिले होते.

मात्र, परवा रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. काल रात्री सर्वत्र दमदार पाऊस पडला. भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे सर्वाधिक २२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल भामरागड येथे २०७ मिलिमीटर, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे १४७.४ मिलिमीटर, सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे १३९ मिलिमीटर, एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथे १२३.२ मिलिमीटर व कसनसूर येथे १२२.६ मिलिमीटर पाऊस पडला. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन काल रात्री ३ फूट पाणी वाहत होते.

पहाटेला पूर ओसरला. परंतु आज सकाळी पुन्हा पुलावरुन पाणी वाहू लागले. हेमलकसा गावाच्या अलिकडे असलेल्या कुमरगुडा येथील नाल्यालाही पूर आला आहे. त्यामुळे त्या भागातील शंभर गावांचा संपर्क तुटला होता. सिरोंचा तालुक्यातील बामणी-टेकडाताला मार्गाचा संपर्क तुटला आहे. चामोर्शी तालुक्यातील दिना नदी, कुरखेड्यातील सती नदी, गडचिरोलीनजीकची कठाणी नदी, पोटफोडी नदी व आरमोरीनजीकची गाढवी नदी व अन्य नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Related posts

नमस्कार, मी अजित पवार बोलतोय, जामगावच्या दिव्यांग चित्रकाराला जेव्हा उपमुख्यमंत्री फोन करतात…

News Desk

जमावबंदीतही आंदोलन, सोयाबीन-कापसाच्या उत्पादकांसाठी स्वाभीमानीचा अन्नत्याग!

News Desk

आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर पडळकर आक्रमक; महाविकासआघाडी सरकारवरही हल्लाबोल

Aprna