HW News Marathi
देश / विदेश

लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर मात्र जेलमधून बाहेर येऊ शकणार नाहीत कारण…

रांची | बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित चाईबासा ट्रेझरी प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळाला आहे. लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर झाला असला तरी त्यांना जेलमधून बाहेर येता येणार नाही आहे. चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र दुमका ट्रेझरी प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरु असल्याने तूर्तास लालूप्रसाद यादव यांना तुरुंगाबाहेर येता येणार नाही.

चाईबासा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांनी त्यांची अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे. या प्रकरणातील अर्धी शिक्षा पूर्ण झाल्यानेच लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सप्टेंबर २०१३ मध्ये चारा घोटाळा प्रकरणी दोषी आढळल्यानंतर लालू प्रसाद यादवांना अटक झाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये ते जामिनावर बाहेर आले. मात्र नंतर पुन्हा २३ डिसेंबर २०१७ मध्ये लालू प्रसाद यादवांना चारा घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर त्यांना बिरसा मुंडा जेल मध्ये पाठवण्यात आलं. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. सध्या न्यायालयीन कोठडी अंतर्गत त्यांच्यावर रिम्समध्ये उपचार सुरु आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधात पोस्ट केल्याने आव्हाडांच्या लोकांकडून जबर मारहाण, तरुणाचा गंभीर आरोप

News Desk

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती खालावली

News Desk

महिला पत्रकारांना पाठवू नका, हिंदू संघटनांचे माध्यमांना पत्र

swarit