HW News Marathi
Covid-19

मनमोहन सिंगांनंतर माजी पंतप्रधान देवेगौडांचं पंतप्रधान मोदींना पत्र, दिले ‘हे’ सल्ले

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमिवर काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर, आता माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही सल्ले दिले आहेत. यात, केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस दिली, तर मानवतेच्या दृष्टीने हा एक चांगला संकेत असेल, असे एचडी देवेगौडा यांनी लिहिले आहे. त्यामुळे पंतप्रधान २ माजी पंतप्रधानांनी आजी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे त्याचा मोदी विचार करणार का? सल्ले आमलात आणणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

एचडी देवेगौडांनी नेमके काय म्हटले आहे पत्रात?

– आरोग्य प्रशासन आणि कोविड व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करायला हवे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना छोट्या करारावर नोकरी देण्याची आवश्यकता आहे.

– सर्व जिल्हा मुख्यालयांत वॉर रूम बनविण्याची आवश्यकता. खासगी आणि सरकारी क्षेत्रांत कोरोना सेंटर आणि आरोग्य केंद्रे वाढविण्याची गरज.

– सध्या ग्रामीण भाग, तालुके आणि गावांत कोविड व्यवस्थापनाची तयारी करण्याची गरज लशीसंदर्भातील भ्रम दूर करण्याची आवश्यकता.

– निवडून आलेल्या लोकप्रतिनिधिंनी, आपल्या मतदारसंघात पुरेशा लशी आहेत, की नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

– देशातील गरीब समुहांना डोळ्यासमोर ठेऊनच लशीची किंमत

– देशातील गरीब समुहांना डोळ्यासमोर ठेऊनच लशीची किंमत निश्चित करायला हवी. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मानवतेच्या दृष्टीने चांगला संकेत असेल.

– सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या गर्भवती महिलांना तीन महिन्यांची सुट्टी द्यायला हवी. तसेच वेतनही द्यायला हवे.

– ज्या कोरोना योध्याचा या लढाईत मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नौकरी द्यायला हवी.

– लस घेण्यासाठी आलेल्या गरीब लोकांना आयडी कार्ड सारख्या समस्येतून मुक्त करायला हवे. इंटरनेट नसणे आणि सरकारी वेबसाइटची माहिती नसणे याचा त्यांच्या लसीकरणावर परिणाम होऊ नये.

– 12-15 वर्षांच्या मुलांसाठीही व्हॅक्सीनेशन ट्रायल व्हायला हवे.

– खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही आरोग्य विमा द्यायला हवा. छोटे नर्सिंग होम आणि ग्रामिण भागांत क्लिनिकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याची आवश्यकता आहे.

– पुढील सहा महिन्यांसाठी मोठ्या सामूहिक हालचालिंवर बंदी घालण्याची आवश्यकता.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता ८९.५३% वर  

News Desk

भाजपचा आमदार फुटला अन् एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटू नये !

News Desk

चिंताजनक! राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत ४ हजार ८१४ विक्रमी नोंद

News Desk