HW News Marathi
देश / विदेश

इंधन दरांमध्ये घट कायम, पेट्रोल २० पैसे तर डिझेल १९ पैशांनी स्वस्त

मुंबई | इंधनाच्या दरांमध्ये सतत घट पाहायला मिळत आहे. आज (८ नोव्हेंबर) इंधन दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल २० पैसे आणि डिझेल १९ पैशांनी स्वस्त झाले आहे. यानुसार मुंबईतपेट्रोलची प्रतिलिटर किंमत ८३.७२ रुपये तर डिझेल प्रतिलिटर ७६.३८ रुपये एवढे पैसे मुंबईकरांना मोजावे लागणार आहेत.

राजधानी नवी दिल्लीतही इंधनाच्या दरांमध्ये घट झाली आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर २१ पैशांनी कमी झालीय तर डिझेल १८ पैशांनी स्वस्त झाले आहे. यानुसार, दिल्लीकरांना प्रतिलिटर पेट्रोलसाठी ७८.२१ रुपये आणि डिझेलसाठी ७२.८९ रुपये द्यावे लागणार आहेत. बुधवारचा (७ नोव्हेंबर) दिवस वगळता गेल्या दोन आठवड्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने घट होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडासा का होईना पण दिलासा मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिल्लीच्या औरंगजेब रोडवर स्फोट,बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

News Desk

अमित शहाच्या स्वागतासाठी बॉईक रॅलीमुळे वाहतूक कोंडी

swarit

केवळ इंग्रजी बोलणं,चांगलं दिसणं हे सर्वकाही नसतं,गेहलोत यांचा पायलटना टोला

News Desk
राजकारण

अनिल अंबानी मोठ्या आर्थिक संकटात, दोन कंपन्यांच्या खात्यात १९ कोटी

News Desk

मुंबई | उद्योगपती अनिल अंबानी राफेल डील घोट्यामुळे सध्या चर्चेत आहेत. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) व रिलायन्स टॉवर्स या दोन कंपन्यांच्या १४४ खात्यांत फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. अमेरिकन टॉवर्स कंपनीच्या (एटीएल) प्रकरणात रिलायन्सने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.

बोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने अनिल अंबानी यांच्या आरकॉमवर २३० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. त्यावरील याचिकेवर उत्तर देताना रिलायन्सने कोर्टात ही माहिती दिली आहे. त्या वेळी कंपनीच्या डोक्यावर ४६ हजार कोटींचे कर्ज आहे.रिलायन्स कम्युनिकेशन्स वायरलेस दूरसंचार क्षेत्रात कार्यरत होती. परंतु भरमसाठ तोट्यामुळे कंपनीने व्यवसाय बंद केला आहे. त्यासाठी हायकोर्टात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान आरकॉमने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कंपनीच्या खात्यात अत्यल्प पैसे असल्याचे उघड केले आहे.

आरकॉमच्या एकूण ११९ बँक खात्यांमध्ये १७ कोटी ८६ लाख रुपये आहेत. रिलायन्स टॉवर्स या उपकंपनीच्या २५ खात्यांत १ कोटी ४८ लाख आहेत. दोन्ही मिळून कंपनीच्या खात्यात फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. त्यामुळेच एटीएलच्या २३० कोटींची थकबाकी देणे शक्य नाही, असे कंपनीने म्हटले आहे. कर्जपरतफेडीसाठी आरकॉमने त्यांच्या मालमत्तेची रिलायन्स जिओला १८ हजार कोटींना विकण्याचा निर्णय घेतला होता. रिलायन्स जिओची तयारीही अंतिम टप्प्यात होती, पण त्याच वेळी एरिक्सन कंपनीने ५५० कोटींच्या वसुलीसाठी या व्यवहाराविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

 

Related posts

Sharad Pawar ED Case | पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

News Desk

मोदींना विरोध करणारे सर्व एकत्र आले, तरीही त्यांचा निभाव लागणार नाही

News Desk

कवी छगन भुजबळ,वाचा सविस्तर…

swarit