HW News Marathi
देश / विदेश

दोन दिग्गजांवर आज होणार अंत्यसंस्कार

मुंबई | वयाच्या ९३व्या वर्षी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. वाजपेयी यांनी गुरुवारी सायंकाळी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी यांच्यावर शुक्रवारी (आज) दिल्लीच्या राजघाटावरील राष्ट्रीय स्मृती येथे सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. किडनी संसर्गामुळे वाजपेयी यांना ११ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाजपेयी यांच्या पार्थिव शुक्रवारी (आज) सकाळी दीनद्याळ उपाध्याय मार्गावरील भाजप कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्यावर शुक्रवारी (आज) दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. मुंबईतील जसलोक रुग्णालयामध्ये मध्य रात्री अजित वाडेकर यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. वाडेकर यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वातील मोठा तारा निखळल्याची भावना व्यक्त केली. परदेशी भूमीवर भारताला विजयाची सवय लावून देणारा कर्णधार अशी वाडेकर यांची वेगळी ओळख होती.

अटल बिहारी वाजपेयी सारख्या एक युगाचा अंत तर भारतीय क्रिकेट टीमला परदेशी भूमीवर सुद्धा विजय मिळवून देणाऱ्याअजित वाडेकर या दोन्ही दिग्गजांचे निधन झाले आहे. या दोघांच्या जाण्याने संपुर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणप्रश्नी पुनर्विचार याचिका दाखल !

News Desk

राजधानीत पावसाचं धूशान!

News Desk

आता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याआधी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का ?

News Desk
मुंबई

फेरीवाल्यांना हटवा, राज यांचे आयुक्तांना निवेदन

News Desk

मुंबई: राज ठाकरे यांनी बुधवारी महापालिका आयुकत्त अजय मेहता यांची भेट घेऊन रस्त्यांवरून फेरीवाल्यांना त्वरीत हटवण्यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी राज यांनी रेल्वे पूल आणि फुटपाथवरून चालणा-या लोकांच्या समस्याही त्यांच्यापुढे मांडल्या. या निवेदनात राज यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदभार्तील अनेक मुद्देही उपस्थित केले आहेत.

या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करावी. जेणेकरून तिन्ही यंत्रणांच्या समन्वयातून ठोस पावले उचलली जातील. मनसेच्या संताप मोचार्नंतर बहुतांश रेल्वे स्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहे. मात्र, हे सगळे किती दिवस टिकेल, असा प्रश्नही लोकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकांना यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी पालिकेने व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. फेरीवाले बसतात त्या परिसरात हे व्हॉटसअ‍ॅप क्रमांक असलेले फलक पालिकेने लावावेत. जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या परिसरात फेरीवाल्यांकडून होणाºया अतिक्रमणाचे फोटो पाठवता येतील.

Related posts

हे आहेत यंदाच्या नवरात्रीचे ९ रंग

News Desk

‘जय राजस्थान’ चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्मरणशक्तीचे पुस्तके पाठवणार

News Desk

भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले, दोन जणांचा मृत्यू

swarit