HW News Marathi
देश / विदेश

बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलकडून अभिवादन

मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज (२६ डिसेंबर) यांच्या १०४वी जयंतीनिमित्ताने गुगलने खास डुडलद्वारे अभिवादन केले आहे. या खास डुडलमध्ये बाबा आमटे यांनी केलेल्या समाजकार्याचा आढावा घेणारे गुगलने ही पाच छायाचित्रांचा एक स्लाईड शो बनविला आहे. मुरलीधर देवीदास आमटे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बाबा आमटे होय. गांधीवादी विचारांनी प्रेरीत असलेल्या बाबा आमटे यांनी समाजातून डावललेल्या कुष्ठरोगींची सेवा सुरू केली. बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी चंद्रपूरमध्ये आनंदवन आश्रम सुरू केले आहे.

बाबांच्या समाजकार्याची महती जगाला दाखवून गुगलने बाबा आमटेंना श्रद्धांजली वाहिली आहे. २६ डिसेंबर १९१४ साली विदर्भातील वर्धा जिल्ह्यात बाबा आमटेंचा जन्म झाला. श्रीमंत घराण्याची पार्श्वभूमी असलेल्या बाबा आमटे यांनी वयाच्या विशीतच वकिली व्यवसाय सुरू केला होता. परंतु, एका कुष्ठरोगीला पावसात भिजताना त्यांचे मन हेलावून गेले होते. त्यानंतर त्यांनी कुष्ठरोगींसाठी आयुष्य वाहून घेतले.

सन १९८५ साली बाबांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो आंदोलन केले होते. देशात एकात्मतेचा संदेश देणे आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बाबांनी हे आंदोलन केले होते. बाबा आमटेंना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तर मानवाधिकार क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना युनाइटेड नेशन्सचाही अवॉर्ड प्रदान करण्यात आला. आपल्या कार्यातून जगाला प्रेरणा देणाऱ्या बाबा आमटेंनी ९ फेब्रुवारी २००८ रोजी अखेरचा श्वास घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देशातील १४ राज्यात तबलिकी समाजामुळे ६४७ जणांना कोरोनाची बाधा

News Desk

जाणून घ्या…’या’ कर्तृत्वान महिलेने पंतप्रधान मोदींच्या अकाउंटवरून केले पहिले ट्वीट

swarit

‘ये दिवार तुटती क्यू नही’ अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे – अजित पवार

Arati More
देश / विदेश

आता बेटांचे ही नामांतर

News Desk

मुंबई | अंदमानमधील तीन बेटांची नावे बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हॅवलॉक बेटाला यापुढील काळात स्वराज द्वीप, नील बेटाला शहीद द्वीप आणि रोझ बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस बेट ही नवीन नावाने दिली जाणार आहे. तीन बेटांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच अंदमानमधील बेटांच्या नामांतराची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ३० डिसेंबर १९४३ रोजी अंदमानला भेट दिली होती. या घटनेस ७५ वर्षे पूर्ण होणार असून, यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. पोर्ट ब्लेअर येथील तत्कालीन जिमखाना मैदान अर्थात आताच्या नेताजी स्टेडियमवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावत अंदमान ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातेवाईक आणि प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनी, अंदमान-निकोबार बेटाचे शहीद आणि स्वराज बेट, असे नामांतरण करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुमारे महिनाभरापूर्वी पत्र लिहून केली होती. स्थानिक लोकांकडून अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचे नाव बदलण्याची मागणी होत असल्याचे बोस यांनी पत्रात म्हटले होते.

Related posts

पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष व्हावे !

News Desk

नीरव मोदीची रद्द पासपोर्टवर परदेशवारी

swarit

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk