HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहिती नाही !

मुंबई | “महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहिती नाही,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. यावरून पवारांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. पुढे म्हणाले की, “आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी स्वत: २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात जाणार असून मी तपासयंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे पवारांनी आज (२५ सप्टेंबर) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी पुढील महिनाभर प्रचारासाठी मुंबईबाहेर असणार आहे. यामुळे ईडीला मी उपलब्ध नाही असे वाटून नये. मी सर्व संस्थामध्ये कधीही संचालक नव्हतो. आयुष्यात कारवाईचा दुसरा प्रसंग असल्याचे पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ७० नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला

राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार घोटाळा झाला होता. राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अजित पवारसह ७६ बड्या नेत्यांवर २६ ऑगस्टला माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४९१, १२० (ब) यांसह लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणी मध्यस्थी समितीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

News Desk

#CoronaVirus | राज्याची चिंता वाढली, कोरोनाबाधितांचा आकडा ४०० पार

News Desk

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, नागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार ?

News Desk