HW News Marathi
देश / विदेश

‘गेल्या ४ वर्षांपासून हिंदू उमेदवार मला प्रचारासाठी बोलवत नाहीत’

नवी दिल्ली | काँग्रेसमधील हिंदू उमेदवार गेल्या चार वर्षांपासून मला प्रचारासाठी बोलवत नाहीत,’ असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. आझाद यावेळी म्हणाले कि, “मी युवक काँग्रेसचा नेता असल्यापासून काँग्रेसच्या विविध निवडणुकांसाठी प्रचार करतो आहे. त्या काळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक नेते मला प्रचार करण्यासाठी बोलवत असत. मात्र आता फारच कमी हिंदू उमेदवार मला प्रचारासाठी बोलावतात.”

अलीगड मुस्लिम विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांच्या एका संमेलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद बोलत होते. “हिंदू उमेदवार निवडणुकीत पराभूत होण्याच्या भीतीमुळे मला बोलवत नाहीत. गेल्या चार वर्षांमध्ये ही संख्या ९५ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आली आहे. आज लोकांना माझी लाज वाटते,” या शब्दात आझाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर पायलट यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

राजकारण नव्हे राजकीय नेते चंचल असतात ! दरेकरांचा राऊतांना टोला

News Desk

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, लोकसभेत भाजपची मागणी

News Desk