HW News Marathi
देश / विदेश

‘गेल्या ४ वर्षांपासून हिंदू उमेदवार मला प्रचारासाठी बोलवत नाहीत’

नवी दिल्ली | काँग्रेसमधील हिंदू उमेदवार गेल्या चार वर्षांपासून मला प्रचारासाठी बोलवत नाहीत,’ असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. आझाद यावेळी म्हणाले कि, “मी युवक काँग्रेसचा नेता असल्यापासून काँग्रेसच्या विविध निवडणुकांसाठी प्रचार करतो आहे. त्या काळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक नेते मला प्रचार करण्यासाठी बोलवत असत. मात्र आता फारच कमी हिंदू उमेदवार मला प्रचारासाठी बोलावतात.”

अलीगड मुस्लिम विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांच्या एका संमेलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद बोलत होते. “हिंदू उमेदवार निवडणुकीत पराभूत होण्याच्या भीतीमुळे मला बोलवत नाहीत. गेल्या चार वर्षांमध्ये ही संख्या ९५ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आली आहे. आज लोकांना माझी लाज वाटते,” या शब्दात आझाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Assembly Elections 2022 VotingLive Updates : सकाळी ९ वाजेपर्यंत यूपीमध्ये ९.४५ टक्के, उत्तराखंडमध्ये ५.१५ टक्के अन् गोव्यात ११.०४ टक्के मतदान

Aprna

बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्यभरात नाराजी

Aprna

“योग दिवसाच्या आड आजचा लपण्याचा दिवस नाही”, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

News Desk
राजकारण

मोदी हत्येचा कट रचणा-यांचा निषेध | आठवले

News Desk

मुंबई | दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडा प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा धक्कादायक ई मेल पोलीस यंत्रणेला मिळाला आहे. याबाबतचे वृत्त कळताच असे षडयंत्र रचणाऱ्या हिंसक देशविघातक प्रवृत्तीचा तीव्र धिक्कार निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देशाचा कारभार करीत असून सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन ते संविधानातील भारत साकार करत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही एका धर्माला ताकद देत असल्याचा आरोप चुकीचा असून त्यांच्याविरुद्ध आत्मघातकी हल्ला करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या देशविघातक शक्तींचा आपण तीव्र निषेध करीत आहोत. अश्या खुनी हल्ल्यांच्या धमक्यांना प्रधानमंत्री बळी पडणार नाहीत. आत्मघातकी हल्ल्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना संपविण्याचे कारस्थान रचणाऱ्या शक्तींना जनता माफ करणार नाही असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

पुणे सत्र न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना राजीव गांधी हत्याकांडासारखे आत्मघातकी हल्ल्यात संपविण्याचा कट असल्याचा ईमेल पोलिसांना मिळाला आहे अशी धक्कादायक माहिती दिली. ही माहिती मिळताच रामदास आठवले यांनी असा कट रचणाऱ्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Related posts

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शरद पवार यांची पत्रकार परिषद; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

‘या’ कारणामुळे अनिल परब ED चौकशीला गैरहजर

Aprna

Shivsena Dasara Melava 2018 | २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार !

News Desk