HW News Marathi
देश / विदेश

‘गेल्या ४ वर्षांपासून हिंदू उमेदवार मला प्रचारासाठी बोलवत नाहीत’

नवी दिल्ली | काँग्रेसमधील हिंदू उमेदवार गेल्या चार वर्षांपासून मला प्रचारासाठी बोलवत नाहीत,’ असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. आझाद यावेळी म्हणाले कि, “मी युवक काँग्रेसचा नेता असल्यापासून काँग्रेसच्या विविध निवडणुकांसाठी प्रचार करतो आहे. त्या काळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक नेते मला प्रचार करण्यासाठी बोलवत असत. मात्र आता फारच कमी हिंदू उमेदवार मला प्रचारासाठी बोलावतात.”

अलीगड मुस्लिम विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांच्या एका संमेलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद बोलत होते. “हिंदू उमेदवार निवडणुकीत पराभूत होण्याच्या भीतीमुळे मला बोलवत नाहीत. गेल्या चार वर्षांमध्ये ही संख्या ९५ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आली आहे. आज लोकांना माझी लाज वाटते,” या शब्दात आझाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#CoronaOutbreak | तेलंगणामध्ये १४ एप्रिलनंतरही पुढचे २ आठवडे लॉकडाऊन कायम राहणार

News Desk

आयोगाच्या आधीच भाजप आयटी सेल प्रमुखानं जाहीर केली मतदानाची तारीख

News Desk

हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय? याचा देशाच्या तिजोरीला उपयोग होणार?

News Desk
महाराष्ट्र

मोदींचे २०२२ चे स्वप्न आम्ही २०१९ मध्येच पूर्ण करू !

Gauri Tilekar

शिर्डी । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यपाल सी.विद्या सागर राव उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी अनेक विविध विकासाच्या कामाचा शुभारंभ करण्यात केला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आवास योजने अंतर्गत २ लाख ४४ हजार लोकांना घर वाटप करण्यात आले आहे. ‘मोदींचे २०२२ चे स्वप्न आम्ही २०१९ मध्येच पूर्ण करू’,असे आश्वसन फडणवीस यांनी मोदींना दिले आहे.

शिर्डीमध्ये लाखो भक्त दाखल होतात ,त्यांना ताटकळत थांबावे लागते म्हणून त्यांच्या सोयीसाठी ‘दर्शनबारी’ तयार करण्यात आली आहे. शिर्डीमध्ये नॉलेज सिटी, उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल स्थापन करणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी सांगितले . ज्या वेळी भारताला ७५ वर्षे पूर्ण होतील त्यावेळी एकही माणूस बेघर राहणार नाही. प्रत्येकाला स्वतःच घर मिळेल असे वचन मोदींनी दिले होते. ‘घर देण्याचे जे वचन दिले गेले होते, ते मोदींनी पूर्ण केले आहे’,असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रमध्ये अडीच लाख लोकांचा गृहप्रवेश आज करण्यात येणार आहेत. ‘साडेचार लाख घरचे काम आम्ही डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार आहोत’, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला काँग्रेस टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला टोला लगावला आहे की, ‘गरिबी हटाओ का नारा’ सगळ्यांनीच दिला. परंतु गरिबांसाठी ज्यांनी काम केले ते फक्त नरेंद्र मोदी आहेत.’ पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कामे सुरु आहेत. स्वछ भारत अभियाना अंतर्गत ३ वर्षात ७ लाख शौचालय बांधून आम्ही महाराष्ट्राला हागणदारी मुक्त करण्यात यश आले आहे,’ असे ही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Related posts

तो गाल सोडला अन् ओम पुरीचा गाल पकडला! – गुलाबराव पाटील

Aprna

महामित्र अ‍ॅपमधील तांत्रिक त्रुटींमुळे निघाले सरकारच्या अब्रुचे धिंडवडे

swarit

“पवारसाहेब, मुख्यमंत्री अन् आमचं नेते ‘या’ लढाईत माझ्या पाठिशी!;”

News Desk