HW News Marathi
देश / विदेश

आनंदी राष्ट्रासाठी विकासाचे प्राधान्य ठरविणे महत्वाचे !

मुंबई | “एखाद्या आनंदी राष्ट्रासाठी प्रत्येकाची भूमिका निर्णायक आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे विकेंद्रीकरण, शाश्वत विकासाचा आग्रह, लोकांच्या सक्षमीकरणाचे कायदे आणि नागरिक घडविण्याची प्रक्रिया या बाबी अत्यंत आवश्यक आहे”, असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे. “महासत्ता हे केवळ मृगजळ असल्याचे सांगत आपल्याला विकासाचे प्राधान्य ठरवून आनंदी राष्ट्राकडे जाता येईल. मात्र, त्यासाठी वास्तवाचे भान ठेवले पाहिजे”, असेही स्पष्ट मत चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या विवेकानंद व्याख्यानमालेत ते ‘भारत: महासत्ता की आनंदी राष्ट्र ?’ या विषयावर बोलत होते. स्वातंत्र्य, समता व न्यायाचे व्हिजन पूर्ण करण्याची गरज असल्याचे नमूद करत आरक्षणाने काहीही साध्य होणार नाही, असेही डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सांगितले आहे. पाणी, वीज ,रस्ते, आरोग्य, शिक्षण या मुलभूत मुद्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये मूलगामी बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत देखील चौधरी यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बलुचिस्तानमधील क्वेट्टा शहरात पुन्हा बॉम्बस्फोट

News Desk

दहशतवादावर चर्चा करण्यास आम्ही तयार | इम्रान खान

News Desk

अर्णबसाठी रस्त्यावर उतरणाऱ्यांच्या रक्तात, मेंदूत गडबड ! ‘सामना’तून भाजपवर निशाणा 

News Desk
महाराष्ट्र

मराठा समाजाला लॉटरी, १६ टक्के आरक्षणानुसार शिक्षक भरती

News Desk

मुंबई | विधानसभेत आज शिक्षक भरतीचा विषय तारांकित प्रश्नात उपस्थित झाला. त्यावर उत्तर देताना सांगितले की, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी असे सांगितले की, २४ हजार ऑनलाइन शिक्षक भरतीमध्ये १६ टक्के मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल आणि ही शिक्षक भरती वेळेत पूर्ण होईल याबाबत सरकार काळजी घेईल.

मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होण्याआधी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला असला तरी शिक्षक भरतीत १६ टक्के मराठा समाजाला राखीव जागा ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. ती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मान्य केली.

मराठा समाजला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काल (२९ नोव्हेंबर) रोजी झाला. हा कायदा लागू करून शिक्षक भरती करण्यात यावी आणि त्यामध्ये मराठा समाजाच्या १६ टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली होती.

Related posts

राज्यसेवा परीक्षा आणि सर्व भर्ती प्रक्रिया पुढे ढकलण्याची संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती

News Desk

महादेव जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तृळात चर्चांना उधाण

News Desk

मिरजमधील २६ कोरोना रुग्णांपैकी पैकी २४ जणांचा अहवाल निगेटिव्ह, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

News Desk