HW News Marathi
देश / विदेश

“निवडणूक जवळ येताच CBI आणि ED कारवाई करते,” राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई | “निवडणूक जवळ येताच सीबीआय आणि ईडी करावायी करते, हे आता नवीन राहिलेले नाही. पण, महाराष्ट्र कोणासमोर वाकणार नाही आणि घाबारपण नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर म्हणाले. शिवसेनेच्या वतीने संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आज (२६ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सर्व महाविकासआघाडी, शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांच्या उपस्थितीत विधानभवनात राज्यसभेतसाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. राऊतांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली. 

महाविकासआघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईचे सत्र सुरू आहे कुठे तरी दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न होत का?, या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, “भाजपने तिसरी, चौथी आणि पाचवी द्यावी. आम्ही आमच्या जागा निवडणू आणू. ईडी आणि सीबीआय दबाव टाकून जर त्यांना जागा जिंकायच्या असतील. तर भाजपने प्रयत्न करत रहावे. यात आमची काही अडचण नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. आणि आम्हला आमच्या जागा लढण्याचा पुर्ण अधिकार आहे. शिवसेना अशा दबावाला भिक घालत नाही. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवर ज्या कारवाया सुरू आहेत. या फक्त राजकीय सुडबुद्धीने आणि बदल्याच्या भावनेने सुरू आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला माहिती आहे की काय चाले ते. पण हा काळही निघून जाईल. आणि एक दिवस ही सुत्रे आमच्याकडे असतील. सर्व देशात केंद्रीय तपास यंत्रणेचे वेळ आम्हला माहिती आहे. मग पश्चिम बंगाल, झारखंड आणि महाराष्ट्र असो. जेव्हा कधी निवडणूक येतात. एखाद्या राज्य सरकारमध्ये अस्थिरता निर्माण करायची असेल. तेव्हा ईडी आणि सीबीआयला पाठवण्यात येते. म्हणजे निवडणूक जवळ येताच सीबीआय आणि ईडी करावायी करते. पण, महाराष्ट्र वाकणार नाही आणि घाबारपण नाही. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी संपूर्ण देशच ताब्यात घ्यावा.”

 “मी स्वत: आणि कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार या दोन उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सर्व महाविकासआघाडी, शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांच्या उपस्थितीत विधानभवनात राज्यसभेतसाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मी खात्रीने सांगू शकतो की यावेळेला शिवसेनेचे दोन्ही उमेदवार हे राज्यसभेत जातील. आणि याबद्दल आमच्या मनात कोणती शंका नाही,” असे राऊत म्हणाले.

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्या राज्यसभेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला नाही, या प्रश्नावर राऊत म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्ल पटेल हे उमेदवार असून ते ३१ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला की ते पक्षाच्या परंपरेप्रमाणे अर्ज दाखल करतील. पण महाविकासआघाडी एकत्र आहेत. आम्ही सगळे सहा जागांपैकी आमच्या चार जागा त्या निवडणून आणू.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नकारात्मक क्रूड तेलाच्या किमतीचा अर्थ म्हणजे भारतीय ग्राहक इंधनासाठी कमी पैसे देतात का?

News Desk

“पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास रक्तरंजित,” बंगाल हिंसाचारावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

पहिल्या टप्याच्या मतमोजणीत काँग्रेसची आघाडी

News Desk