HW News Marathi
देश / विदेश

एकाच दिवसात तीन वेळा पाकच्या ‘नापाक’ कारवाया

श्रीनगर | पाकिस्तानने मंगळवारी (५ मार्च) एकाच दिवशी तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी आणि नौशेरा तर, पुंछ जिल्यातील कृष्णा घाटी या भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाककडून सुरू झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला असून बुधवारी (६ मार्च) पहाटे ४.३० वाजेपर्यंत ही चकमक थांबली.

सुंदरबनी भागात रात्री १० वा. शस्‍त्रसंधीचे उल्लंघन झाले. मंगळवारी नौशेरा सीमेवर सकाळी ११ वाजता गोळीबार करण्यास सुरूवात केली. या चकमकीत एका भारतीय जवानाला गोळी लागली आहे. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता कृष्णा घाटी भागात मोर्टार बॉम्ब हल्ला आणि गोळीबार केला. मागील आठवड्यात पाकिस्ताने सीमारेषेवर ६० वेळा शस्‍त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकाच कुटूंबातील ३ नागरिकांसोबत ४ नागरीकांचाही मृत्यू झाला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Article370Abolished : पाकव्याप्त काश्मीरसाठी आम्ही जीव सुद्धा देऊ !

News Desk

Republic Day | तिरंग्याच्या रोषणाईने मुंबईची शोभा वाढली

News Desk

संसदरत्न पुरस्कार ४ वेळा प्राप्त करणारे काँग्रेसचे खासदार राजीव सातव!

News Desk