HW News Marathi
देश / विदेश

पुलावामा जिल्ह्यात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांचा कुरापती अजूनही सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात आज (१२ फेब्रुवारी) सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत कोणालाही हानी पोहोचल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. दरम्यान, भारतीय सैन्याने या संपूर्ण परिसराला घेरले असून गोळीबार अजूनही सुरुच आहे.

पुलवामा जिल्ह्यातील रात्नीपोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरु झाली. दरम्यान, सुरक्षा दलांच्या जवानांनी हा संपूर्ण परिसर घेरल्याने दहशतवाद्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

News Desk

धक्कादायक ! तेलंगणामध्ये महिला पोलिसाला जबर मारहाण

News Desk

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk
देश / विदेश

आण्णा हजारेंच्या आरपारच्या क्रांतीला प्रारंभ

News Desk

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला आजपासून दिल्लीतून सुरुवात झाली आहे. अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला अखेरची लढाई असे संबोधले आहे. स्वातंत्र्यांची दुसरी लढाई असे यापूर्वीच्या आंदोलनाला नाव देण्यात आले होते. त्यातून केजरीवाल व आप नावाचा पक्ष उदयास आला होता.

यावेळी आण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे फलित काय राहणार आहे, याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. गेल्या तीन साडेतीनवर्षे अण्णा शांत बसून होते. त्यांनी केंद्राच्या कारभारावर वेळोवेळी टीका केली. परंतु त्याची केंद्राने दखले घेतली नाही. अखेर अण्णांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.

शुक्रवारी सकाळी अण्णांनी रामलीला मैदानावर आपल्या आंदोलनाला सुरुवात केली. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव, जनलोकपालची अंमलबजावणी या अण्णांच्या प्रमुख मागण्या आहेत. रामलीला मैदानावर देशभरातून आंदोलक दाखल होत आहेत.

आंदोलन दडपण्यासाठी सरकारने दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांना एकप्रकारे सरकार हिंसेसाठी प्रवृत्त करत असल्याचा गंभीर आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.

Related posts

“…. तर मात्र राज्याची स्पष्ट भूमिका मांडू” – जीएसटी संदर्भात अजित पवारांचा इशारा

News Desk

आता महाराष्ट्रासह भगतसिंह कोश्यारींकडे आणखी एका राज्याची जबाबदारी 

News Desk

इराणमधून २०० जण आज मुंबईत येणार

swarit