HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, चार जवान शहीद

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करताना चार जवान शहीद झाले आहे. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करणाऱ्या असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेही चकमक अद्याप सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. यात भारतीय लष्कराच्या एका मेजरसह तीन जवान शहीद झाले आहेत. या परिसरात भारतीय लष्कर लपून बसल्याची शक्यता वर्तवली असून येथे लष्कराचे शोधकार्य सुरू आहे.भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती येणे बाकी आहे. आणि या जवानांची नावे आणि इतर माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव, भाजपचा कॉंग्रेसवर निशाणा 

News Desk

Republic Day | यंदा महाराष्ट्राच्या वतीने ‘छोडो भारत’ चळवळ दर्शविणारा चित्ररथ

News Desk

कोफी अन्नान यांचे निधन

News Desk
मुंबई

सावधान मुंबईकरांनो, चायनीज गाड्यांवर निकृष्ट दर्जाचे चिकन

News Desk

मुंबई | मुंबईतील चायनीज गाड्यांवर सध्या निकृष्ट दर्जाचे चिकन दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील शिवडीमध्ये महापलिकेने टाकलेल्या धाडीत ही बाब उघड झाली आहे. रोगट, आधीच मेलेल्या कोंबड्या कापून त्याच चायनीज गाड्यांवर विकल्या जात असल्याने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ होत आहे.

रस्त्यांवरील गाड्यांवर तुम्ही चायनीज खात असाल, तर ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. शिवडी परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. शिवडीतल्या एका अनधिकृत झोपडीत २५ किलो खराब चिकन आढळून आले. हे खराब चिकन चायनीजच्या गाड्यांवर ३० रुपये किलो दराने विकले जात होते. हे चिकन कुजलेल्या अवस्थेत होते.

याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, आर ए किडवई नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चायनीजच्या गाड्यांवर पदार्थांमध्ये वापरले जाणारे चिकन हे निकृष्ट, कुजलेल्या, खराब कोंबड्यांचे असल्याचे आढळून आले. शिवडीत ज्या झोपडपट्टीत हे चिकन पकडलं ते तब्बल २५ किलो खराब, कुजलेले चिकन होते. काही दिवसांपूर्वीच शहापूर तालुक्यातील खर्डी येथे चायनीजचे काही पदार्थ खाल्ल्याने जवळपास ३० जणांना विषबाधा झाली होती. त्यामुळे तुम्ही जर गाड्यांवर चायनीज खात असाल, तर सावधान.

Related posts

हार्बर रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

News Desk

‘त्या’ पाचही मुली सापडल्या…

News Desk

बुचर बेटावरील इंधनाच्या टाकीला भीषण आग

News Desk