HW News Marathi
देश / विदेश

भारतीय सैन्याकडून जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीर | भारतीय सैन्याच्या जवानांनी पुलवामामधील जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात पाकिस्तानच्या एका स्नायपरचाही देखील समावेश आहे. उस्मान हैदर असे या स्नायपरचे नाव आहे. काल (मंगळवार) त्रालमधल्या झालेल्या चकमकीत या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.

उस्मान हैदर हा स्नायपर दहशतवादी मसूद अझरचा भाचा असल्याची माहिती देखील समोर येत आहे.गुप्तचर यंत्रणेने भारतीय सैन्याला दिलेल्या माहितीच्या आधारे ही संपूर्ण शोध मोहीम राबविण्यात आली होती. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना चारही बाजूनी घेतल्यानंतर ते ज्या घरातून गोळीबार करत होते ते घरच भारतीय सैन्याने उध्वस्त केले आहे.

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती समोर आली होती. सप्टेंबरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी दोन गटांमध्ये काश्मीरमध्ये आले होते. या गटांमध्ये एकूण ४ प्रशिक्षित दहशतवादी आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना देण्यात आली होती. आयएसआयने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे देखील म्हटले जात होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रोड शोदरम्यान पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकावली

News Desk

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपचा सेनेला सवाल

News Desk

तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय

News Desk
महाराष्ट्र

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

swarit

नाशिक | अहमदनगर-नाशिकच्या धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत आज (३१ ऑक्टोबर)ला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जायकवाडीला पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

नाशिकमधील गंगापूर आणि दारणा, तसेच अहमदनगरच्या भंडारदरा आणि निळवंडे या धरणांतून एकाच वेळी पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे मराठवाड्याला पाण्यासाठी गेली दोन दिवस वाट बघत आहे.

धरणात ऐवढे पाणी सोडले जाणार

जायकवाडी धरणामध्ये मुळामधून ५४ दलघमी १.९० टीएमसी, प्रवरामधून १०९ दलघमी ३.८५ टीएमसी, गंगापूर धरणातून १७ दलघमी ०.६० टीएमसी, दारणा धरणातून ५७.५० दलघमी २.०४ टीएमसी, पालखेड समुहातून १७० दलघमी ६० टीएमसी असं एकूण २५४ दलघमी (८.९९ टीएमसी) अशा विविध धरणांमून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात येणार आले आहेत.

Related posts

नागपूर पदवीधर मतदार संघात काँग्रेसची आघाडी तर भाजपची पिछाडी!

News Desk

जो आवडतो सगळ्यांना तोची आवडे देवाला! सातव यांच्यावर असिम सरोदेंची भावूक पोस्ट

News Desk

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची राहुल गांधींवर टीका!

News Desk